Monday, September 15, 2014

विकली ऑफ ????

विकली ऑफ ????  ( बेवड्याची डायरी - भाग ६७ वा ) 

स्त्री ला दुय्यम स्थान दिले गेल्या मुळेच स्त्री वरील अन्याय व अत्याचाराचे प्रमाण वाढते आहे ..तिच्यावर अनेक बंधने लादली गेली आहेत ..स्त्री वर होणार्या कौटुंबिक अन्यायाचे प्रमाण तर खूप मोठ्या प्रमाणात आहे ...बहुतेक वेळा स्त्री सहनशिलते मुळे चूप बसते..घराची अब्रू चव्हाट्यावर यायला नको याची काळजी घेते ..म्हणूनही हे प्रमाण वाढते आहे ..सध्या कायद्याने जरी स्त्रीला जरी खूप झुकते माप दिले असले तरी .. स्त्रिया बहुधा कायद्याची मदत घेणे टाळतात ..कारण त्यांना कुटुंबाची ..पतीची समाजात बदनामी झालेली मनापासून आवडत नाही..गम्मत म्हणून सांगतो अनेकांना कदाचित हा कायदा माहित नसेल ..एक कायदा स्त्री च्या बाजूने असा आहे की स्त्री ला आठवड्यातून एकदा हक्काची सुटी द्यायला हवी ..म्हणजे आठवड्यातून एक दिवस ..स्वैपाकपाणी .धुणीभांडी..घरातील इतर जवाबदा-या यातून स्त्रीला हक्काची सुटी मिळाली पाहिजे असे कायद्याने सांगितले आहे ..कारण नोकरी करणाऱ्या पुरुषांना आठवड्यातून एकदा सुटी मिळते ..त्या दिवशी ते आज सुटी आहे ..मी मनसोक्त जगणार असे हक्काने सांगतात ..शनिवारी रात्रीपासूनच ते सुटी उपभोगायला सुरवात करतात ..मग रविवारी उशिरा उठणे ..आळसात दिवस घालवणे ..अशा गोष्टी ते करतात ..मात्र स्त्री ला सकाळी उठून सगळ्यांसाठी चहा करणे ..केर काढणे ..घरातील आवरासावर करणे ..स्वैपाक करणे ..पाने वाढणे ..पाने काढणे .या गोष्टींपासून कधीच सुटी नसते ..म्हणून अशी सुटी कायद्याने मंजूर केली आहे ..मात्र किती पुरुषांना आठवड्यातून एकदा का होईना स्वताचा चहा स्वतः करून घेणे ...घरातील केर काढणे ..स्वैपाक करणे ..घराची आवरासावर करणे हे रुचेल? " ..कोणीच हात वर केला नाही ..ते पाहून सर म्हणाले .." पहा एकही हात वर झाला नाही ..म्हणजेच विशिष्ट कामे स्त्रियांनीच करायला हवीत ..हा समज आपल्या मनात पक्का बसलाय ..अगदी तसेच स्त्री च्या बाबतीत झालेय ..वर उल्लेखलेली कामे स्त्रियांनीच करायची असतात असे त्यांच्या मनावर लहानपणापासून ठसवले गेले आहे ..त्यामुळे कायद्याने आठवड्यातून एक दिवस कौटुंबिक जवब्दार्यातून हक्काची सुटी घेण्याची मुभा असली तरी स्त्रिया ही सवलत घेत नाहीत हे आपले नशीबच म्हणायचे ..जर एखाद्या स्त्री ने अशी हट्टाला पेटून आठवड्यातून एकदा कौटुंबिक जवब्दार्यातून सुट्टी मागितली आणि अशी सुटी मिळाली नाही म्हणून पोलीसात तक्रार करेल तर सगळा समाज त्या स्त्री च्या विरोधात जाईल ..बाईच्या जातीने असे करायला नको म्हणेल ..सासरचेच काय तिच्या माहेरचे देखील तिच्यावर नाराज होतील ".

" सर मैने ऐसा सुना है के जो स्त्री रजस्वला होती है ..उसने भगवान की पूजा नही करनी चाहिये ..और उसके छुनेसे घरका आचार खराब होता है... ये बात सही है क्या ? छान प्रश्न आहे तुमचा ..आपण शास्त्रीय दृष्टीकोनातून या गोष्टीकडे पहिले पाहिजे ..एकविसाव्या शतकात प्रवेश करूनही आपण अजूनही अनेक प्रकारच्या धार्मिक अंधश्रद्धा पाळतो ..खरे तर रजोस्त्राव ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ..स्त्री वयात आल्यावर ..म्हणजे तिच्या शरीरात बीजांड अथवा स्त्रीबिजाची निर्मिती सुरु झाल्यावर ..ती स्त्री गर्भवती होण्याची क्षमता तिच्यात निर्माण होते ..ही प्रक्रिया जरी सर्व साधारणपणे वयाच्या १२ ते १६ व्या वर्षापर्यंत सुरु होत असली तरी देखील तिचे गर्भाशय परिपक्व होऊन गर्भाचे योग्य पोषण होण्यास वयाची अठरा वर्षे पूर्ण व्हावी लागतात ..मात्र एकदा बीजांडाची निर्मिती सुरु झाली की स्त्री बीजाचा शुक्राणूशी संबंध येवून गर्भधारणा होऊ शकते ..अशा वेळी गर्भधारणा झाल्यास गर्भाची सुरक्षित वाढ व्हावी ..त्याला गर्भाशयात योग्य संरक्षण मिळावे म्हणून ..गर्भाशयात एक पातळसर त्वचेचे अस्तर तयार होते ..जर बीजांड फलन होऊन गर्भधारणा झाली नाही तर ते अस्तर आपोआप सुटून गर्भाशयातून विलग होते व ते तुकड्यांच्या स्वरुपात योनीमार्गातून रक्तासह बाहेर पडते ..याला रजोस्त्राव म्हणतात .. ही प्रक्रिया सुमारे तीन ते चार दिवस चालते ..त्या काळात हा रक्तस्त्राव सतत योनीमार्गातून होत असतो ..पूर्वीच्या काळी हल्ली असलेले सेफ्टी पॅड अस्तित्वात नव्हते ..या कालावधीत स्त्रीच्या ओटीपोटात सतत वेदना होऊ शकतात..तसेच सतत स्त्रवणाऱ्या स्त्रावामुळे स्त्री ला अवघडले पण वाटत असते ..त्या काळी अशा स्त्री ने कौटुंबिक जवाबदा-यातून सुटी घेवून आराम करावा म्हणून ..या काळात तिने कोणतीही कामे करू नयेत ..वेगळे बसावे ..कोणाला स्पर्श करू नये असे सांगितले जाई ..थोडक्यात अशा स्त्री ला विश्रांती घेता यावी असा हेतू या मागे होता ..त्यासाठी देवपूजा करू नये ..पाण्याला शिवू नये ..वगैरे बंधने घालण्यात आली ..नंतर याबाबत अनेक अंधश्रद्धा जोडल्या जावून ..लोणचे खराब होणे वगैरे अंधश्रद्धा पुढे आल्या ..हल्लीच्या वेगवान काळात स्त्री देखील पुरुषांच्या जोडीने सर्व क्षेत्रात यशस्वीपणे वावरते आहे..दर महिन्यात निर्माण होणाऱ्या रजोस्त्रावात अवघडलेपण वाटू नये म्हणून आरामदायी सेफ्टीपॅडस बाजारत उपलब्ध आहेत ..पूर्वी असा स्त्राव सुसह्य होण्यासाठी सेफ्टीपॅडस नव्हते ..एखादा कपडा योनिमार्गाजवळ लावून काम भागवले जाई ..तरीही हा प्रकार अतिशय अवघडलेपणाचा असतो हे नक्की ..तुम्ही कल्पना करा की तुम्हाला जर सतत असा स्त्राव सतत होऊन तीन चार दिवस डायपर लावून वावरावे लागले तर कसे वाटेल ? ' सरांच्या या प्रश्नाने आम्ही विचारात पडलो ..एकंदरीत कठीणच होते ते .

( बाकी पुढील भागात )

No comments:

Post a Comment