Saturday, October 4, 2014

गुप्त....खाजगी !

गुप्त....खाजगी ! ( बेवड्याची डायरी - भाग ६८ वा )
समूह उपचार संपल्यावर आम्ही तीन चार जण नेहमी प्रमाणे..सरांनी आज सांगितलेल्या विषयावर चर्चा करत बसलो होतो ..सुरवातीला जरी ' लैंगिक शिक्षण ' हा विषय व्यसनमुक्तीसाठी निरूपयोगी आहे असे आम्हा सर्वाना वाटले होते तरी नंतर जाणवले की..या बाबतीत शास्त्रीय माहितीपेक्षा ऐकीव माहितीच आमच्या कडे जास्त होती ..पूर्व प्रणय ..पश्चात प्रणय ..लैंगिक संबंधा बाबतची स्त्री पुरुषांची वेगवेगळी मानसिकता..हे सर्व मी प्रथमच ऐकत होतो ..गम्मत म्हणून एकाने शेरकर काकांना एकाने विचारले ' क्यो काका ..आप तो ये सब पहेले भी सून चुके हो ना ? आपकी पाचवी अडमिशन हे यहाॅपर .." काकांना त्यांच्या पाचव्या वेळी उपचारांना दाखल झाले आहेत हा उल्लेख आवडला नाही ..ते त्यांना टोमणा मारणाऱ्याला पटकन म्हणाले " अबे इतना उड मत ..पहेली अडमिशन है तेरी ..बहोत आसान लग रहा है ना तुझे सबकुछ ..नशामुक्ती इतनी आसान नही है ..अगली बार फिर आना पडेगा तेरेको ..अगर मेरी मजाक करेगा तो " काकांची हि शापवाणी ऐकून सगळे हसू लागले ..ज्याला काकांनी अगली बार फिर आना पडेगा असा शाप दिला होता..तो चिडला " अरे बुढढे ..जरा शुभ बोलना सिख ले तू ..तेरे आधे पैर कब्र में लटक रहे है फिर भी सेक्स कि बाते बडे चाव से सून रहा था " पुन्हा सगळे हसले ..आता सर्वच शेरकर काकांची मस्करी करू लागले ..एक म्हणाला " काका ये आपके माथे पर निशान कैसा है ? मैने सुना है के गाव मे किसी लडकी को छेडा था आपने तो उसने पत्थर मारा था फेंककर ? " दुसरा म्हणाला " नही यार ..ती वेगळी स्टोरी आहे ..काका आंबटशौकीन आहेत त्यामुळे झालेय हे..काका एकदा शेतावर जात असताना ..एका तुरीच्या काड्यांनी बनवलेल्या टेम्पररी बाथरूम मध्ये कोणीतरी अंघोळ करत होते ..काकांना वाटले कोणी बाई असेल .. काका गुपचूप वरून डोकावून पाहायला गेले .... अचानक काकांचा तोल गेला आणि काका त्या ताटीवरच पडले ..ताटी तुटून काकांसकट बाथरूममध्ये पडली ..थेट दगडावर डोके आपटले काकांचे ..मुख्य म्हणजे बाथरूम मध्ये कोणी बाई नव्हती तर काकांचाच एक शेतावरचा नोकर अंघोळ करत होता ..चक्क दांडेकर " सगळे खिदळू लागले ..काका शरमले हे सगळे काल्पनिक आहे असे ..स्पष्टीकरण देवू लागले आम्हाला ..
अशी थट्टा मस्करी चालली असताना ..एक माझ्याजवळ येवून म्हणाला " जरा आपसे प्रायव्हेट बात करनी है ..चलो जरा बाजू में " मी आणि तो दोघे जरा बाजूला जावून बसलो .." क्या आप मेरी तरफ से एक सवाल पुछोगे सर को ? " मी हकारार्थी मान डोलावली ..तो पुढे म्हणाला " मी मागच्या वेळी इथे अॅडमिट होतो ..एक महिना उपचार घेवून घरी गेल्यावर ..जेव्हा पत्नी जवळ गेलो तेव्हा मला अजिबात उत्तेजना आली नाही ..त्यामुळे मला खूप वाईट वाटले ..आता आपण कायमचे नपुंसक झालोत कि काय ? ..त्या टेन्शन मध्ये मी परत दारू प्यायलो ..मला सरना विचारायचे आहे की असे होते का ? त्यावर उपाय काय ? " ' अहो मग तुम्हीच सरांना विचार की हे ..लाजता कशाला ? " मी त्याला धीर देत म्हणालो ..मात्र तरीही तो तयार होईना ..शेवटी मी त्याला विचारीन सरांना असे म्हणून दिलासा दिला ..त्याचा प्रश्न स्वभाविक होता ..पण त्याने मोकळेपणी ही समस्या सरांजवळ बोलायला हवी होती असे मला वाटले ...इथे दाखल झाल्यावर पहिल्या आठवड्यात जेव्हा सरांनी मला भेटायला बोलावले होते तेव्हाच सांगितले होते ..येथे भरपूर प्रश्न विचारा ..मनात काहीही ठेवू नका ..कितीही खाजगी प्रश्न असला तरी येथील समुपदेशकांना विचारा ..कारण मोकळेपणी आपल्या समस्या मांडल्या तरच त्याची उत्तरे मिळतात ..येथील सर्व समुपदेशक तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्यास समर्थ आहेत ..जेथे त्यांना उत्तर माहित नसेल तेथे ते तुम्हाला मार्ग सांगतील नक्की " मला ते आठवले आणी मी त्याच्या वतीने सरांना प्रश्न विचारायचे ठरवले ..माॅनीटर ला मला सरांची भेट घ्यायची आहे असे सांगितले तर त्याने बाहेर ऑफिस मध्ये जाण्यास परवानगी दिली ..बाहेर जावून मी सरांना ..त्या मित्राने सांगितलेल्या समस्ये बद्दल विचारले ..याचे उत्तर तुम्हाला एकट्याला देण्यापेक्षा मी उद्या याच बाबत बोलतो ..असे सर म्हणाले.
दुसऱ्या दिवशी समूह उपचारांच्या वेळी सरांनी तो विषय काढलाच .." मित्रांनो परवा पासून आपण आपल्या जीवनाशी निगडीत असलेली अतिशय महत्वाच्या विषयावर चर्चा करतो आहोत ..ती चर्चा अजून एक दिवस चालेल ..मात्र माझी तुम्हाला विनंती आहे ..की या बाबत तुम्हाला असणाऱ्या समस्या ..प्रश्न तुम्ही मोकळेपणी विचाराल तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल ..दारू आणि अन्य मादक पदार्थांमुळे आपली लैंगिक क्षमता वाढल्याचा...स्खलन कालावधी वाढल्याचा..इंद्रिय उत्तेजना अधिक असल्याचा जरी सुरवातीला अनुभव आला असला तरी ..नंतर नंतर या व्यसनांमुळे आपल्या लैंगिक क्षमतेवर परिणाम होत जातो ..काही जणांना इंद्रिय उत्तेजानेची समस्या येते ..काहीना शिघ्रपतनाची..समस्या जाणवते ..तर काही जणांच्या शुक्राणूंची क्षमता कमी होऊन अपत्यप्राप्तीत अडथळे निर्माण होतात ..इथून बाहेर पडल्यावर तुम्हाला जर काही लैगिक समस्या आल्या तर ..अजिबात संकोच न करता भेटायला याल तेव्हा आम्हाला सांगा ..एक सर्वसामान्य समस्या म्हणजे शीघ्रपतनाची असते ..असा अनुभव आहे की येथून उपचार घेवून बाहेर पडल्यावर अनेकांना आपल्या जोडीदाराबरोबर लैंगिक संबंध करताना शीघ्रपतनाची समस्या जाणवते ..त्यांना आपले पौरुषत्व कमी झालेय असे वाटते .. लैंगिक संबंध पूर्ण होण्याआधीच त्यांचे स्खलन होते...त्यांना अशा वेळी खूप लज्जास्पद वाटते ..जोडीदाराची लैंगिक तृप्ती करण्यास पण असमर्थ झालोत अशी न्यून गंडाची भावना निर्माण होते ..व्यसन करत असताना हे होत नव्हते ..आता व्यसन केले नाही म्हणून होतेय की काय असे वाटून.. ते पुन्हा व्यसन करून लैंगिक संबंध प्रस्थापित करू पाहतात .. बंद असलेले व्यसन पुन्हा सुरु होते ..इथे घेतलेले उपचार शून्य होतात ..जर तुम्ही अशा प्रकारच्या समस्या आम्हाला सांगितल्या तर नक्कीच व्यसनमुक्ती टिकवता येणे सोपे होईल..कारण ही शीघ्र पतनाची किवा इंद्रिय उत्तेजनेची समस्या..तात्पुरती असते ..कोणताही न्यूनगंड न बाळगता हे आपल्या जोडीदाराला समजावून सांगा ..एखाद्या लैंगिक उपचार तज्ञाची( सेक्सॉलाॅजिस्ट ) मदत घ्या .. यावर औषधे व गोळ्या उपलब्ध आहेत . मात्र चुकुनही रस्त्यावर बसणाऱ्या वैदू कडून जडीबुटी खरेदी करू नका ..अथवा ऐकीव गोष्टी करू नका ..हे वैदू अथवा वर्तमान पत्रात जाहिरात देवून लैंगिक समस्यावर औषधे देणाऱ्या खोट्या ..फसव्या पदव्या धारण करणाऱ्या लोकांची मदत घेवू नका .त्यामुळे तुमचे अधिक नुकसान होईल .
( बाकी पुढील भागात )

Monday, September 15, 2014

विकली ऑफ ????

विकली ऑफ ????  ( बेवड्याची डायरी - भाग ६७ वा ) 

स्त्री ला दुय्यम स्थान दिले गेल्या मुळेच स्त्री वरील अन्याय व अत्याचाराचे प्रमाण वाढते आहे ..तिच्यावर अनेक बंधने लादली गेली आहेत ..स्त्री वर होणार्या कौटुंबिक अन्यायाचे प्रमाण तर खूप मोठ्या प्रमाणात आहे ...बहुतेक वेळा स्त्री सहनशिलते मुळे चूप बसते..घराची अब्रू चव्हाट्यावर यायला नको याची काळजी घेते ..म्हणूनही हे प्रमाण वाढते आहे ..सध्या कायद्याने जरी स्त्रीला जरी खूप झुकते माप दिले असले तरी .. स्त्रिया बहुधा कायद्याची मदत घेणे टाळतात ..कारण त्यांना कुटुंबाची ..पतीची समाजात बदनामी झालेली मनापासून आवडत नाही..गम्मत म्हणून सांगतो अनेकांना कदाचित हा कायदा माहित नसेल ..एक कायदा स्त्री च्या बाजूने असा आहे की स्त्री ला आठवड्यातून एकदा हक्काची सुटी द्यायला हवी ..म्हणजे आठवड्यातून एक दिवस ..स्वैपाकपाणी .धुणीभांडी..घरातील इतर जवाबदा-या यातून स्त्रीला हक्काची सुटी मिळाली पाहिजे असे कायद्याने सांगितले आहे ..कारण नोकरी करणाऱ्या पुरुषांना आठवड्यातून एकदा सुटी मिळते ..त्या दिवशी ते आज सुटी आहे ..मी मनसोक्त जगणार असे हक्काने सांगतात ..शनिवारी रात्रीपासूनच ते सुटी उपभोगायला सुरवात करतात ..मग रविवारी उशिरा उठणे ..आळसात दिवस घालवणे ..अशा गोष्टी ते करतात ..मात्र स्त्री ला सकाळी उठून सगळ्यांसाठी चहा करणे ..केर काढणे ..घरातील आवरासावर करणे ..स्वैपाक करणे ..पाने वाढणे ..पाने काढणे .या गोष्टींपासून कधीच सुटी नसते ..म्हणून अशी सुटी कायद्याने मंजूर केली आहे ..मात्र किती पुरुषांना आठवड्यातून एकदा का होईना स्वताचा चहा स्वतः करून घेणे ...घरातील केर काढणे ..स्वैपाक करणे ..घराची आवरासावर करणे हे रुचेल? " ..कोणीच हात वर केला नाही ..ते पाहून सर म्हणाले .." पहा एकही हात वर झाला नाही ..म्हणजेच विशिष्ट कामे स्त्रियांनीच करायला हवीत ..हा समज आपल्या मनात पक्का बसलाय ..अगदी तसेच स्त्री च्या बाबतीत झालेय ..वर उल्लेखलेली कामे स्त्रियांनीच करायची असतात असे त्यांच्या मनावर लहानपणापासून ठसवले गेले आहे ..त्यामुळे कायद्याने आठवड्यातून एक दिवस कौटुंबिक जवब्दार्यातून हक्काची सुटी घेण्याची मुभा असली तरी स्त्रिया ही सवलत घेत नाहीत हे आपले नशीबच म्हणायचे ..जर एखाद्या स्त्री ने अशी हट्टाला पेटून आठवड्यातून एकदा कौटुंबिक जवब्दार्यातून सुट्टी मागितली आणि अशी सुटी मिळाली नाही म्हणून पोलीसात तक्रार करेल तर सगळा समाज त्या स्त्री च्या विरोधात जाईल ..बाईच्या जातीने असे करायला नको म्हणेल ..सासरचेच काय तिच्या माहेरचे देखील तिच्यावर नाराज होतील ".

" सर मैने ऐसा सुना है के जो स्त्री रजस्वला होती है ..उसने भगवान की पूजा नही करनी चाहिये ..और उसके छुनेसे घरका आचार खराब होता है... ये बात सही है क्या ? छान प्रश्न आहे तुमचा ..आपण शास्त्रीय दृष्टीकोनातून या गोष्टीकडे पहिले पाहिजे ..एकविसाव्या शतकात प्रवेश करूनही आपण अजूनही अनेक प्रकारच्या धार्मिक अंधश्रद्धा पाळतो ..खरे तर रजोस्त्राव ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ..स्त्री वयात आल्यावर ..म्हणजे तिच्या शरीरात बीजांड अथवा स्त्रीबिजाची निर्मिती सुरु झाल्यावर ..ती स्त्री गर्भवती होण्याची क्षमता तिच्यात निर्माण होते ..ही प्रक्रिया जरी सर्व साधारणपणे वयाच्या १२ ते १६ व्या वर्षापर्यंत सुरु होत असली तरी देखील तिचे गर्भाशय परिपक्व होऊन गर्भाचे योग्य पोषण होण्यास वयाची अठरा वर्षे पूर्ण व्हावी लागतात ..मात्र एकदा बीजांडाची निर्मिती सुरु झाली की स्त्री बीजाचा शुक्राणूशी संबंध येवून गर्भधारणा होऊ शकते ..अशा वेळी गर्भधारणा झाल्यास गर्भाची सुरक्षित वाढ व्हावी ..त्याला गर्भाशयात योग्य संरक्षण मिळावे म्हणून ..गर्भाशयात एक पातळसर त्वचेचे अस्तर तयार होते ..जर बीजांड फलन होऊन गर्भधारणा झाली नाही तर ते अस्तर आपोआप सुटून गर्भाशयातून विलग होते व ते तुकड्यांच्या स्वरुपात योनीमार्गातून रक्तासह बाहेर पडते ..याला रजोस्त्राव म्हणतात .. ही प्रक्रिया सुमारे तीन ते चार दिवस चालते ..त्या काळात हा रक्तस्त्राव सतत योनीमार्गातून होत असतो ..पूर्वीच्या काळी हल्ली असलेले सेफ्टी पॅड अस्तित्वात नव्हते ..या कालावधीत स्त्रीच्या ओटीपोटात सतत वेदना होऊ शकतात..तसेच सतत स्त्रवणाऱ्या स्त्रावामुळे स्त्री ला अवघडले पण वाटत असते ..त्या काळी अशा स्त्री ने कौटुंबिक जवाबदा-यातून सुटी घेवून आराम करावा म्हणून ..या काळात तिने कोणतीही कामे करू नयेत ..वेगळे बसावे ..कोणाला स्पर्श करू नये असे सांगितले जाई ..थोडक्यात अशा स्त्री ला विश्रांती घेता यावी असा हेतू या मागे होता ..त्यासाठी देवपूजा करू नये ..पाण्याला शिवू नये ..वगैरे बंधने घालण्यात आली ..नंतर याबाबत अनेक अंधश्रद्धा जोडल्या जावून ..लोणचे खराब होणे वगैरे अंधश्रद्धा पुढे आल्या ..हल्लीच्या वेगवान काळात स्त्री देखील पुरुषांच्या जोडीने सर्व क्षेत्रात यशस्वीपणे वावरते आहे..दर महिन्यात निर्माण होणाऱ्या रजोस्त्रावात अवघडलेपण वाटू नये म्हणून आरामदायी सेफ्टीपॅडस बाजारत उपलब्ध आहेत ..पूर्वी असा स्त्राव सुसह्य होण्यासाठी सेफ्टीपॅडस नव्हते ..एखादा कपडा योनिमार्गाजवळ लावून काम भागवले जाई ..तरीही हा प्रकार अतिशय अवघडलेपणाचा असतो हे नक्की ..तुम्ही कल्पना करा की तुम्हाला जर सतत असा स्त्राव सतत होऊन तीन चार दिवस डायपर लावून वावरावे लागले तर कसे वाटेल ? ' सरांच्या या प्रश्नाने आम्ही विचारात पडलो ..एकंदरीत कठीणच होते ते .

( बाकी पुढील भागात )

Sunday, September 14, 2014

बंदिनी .. ? ? ?

बंदिनी .. ? ? ?  ( बेवड्याची डायरी - भाग ६६ वा ) 

लहानपणापासून पुरुषांच्या मनावर... तू स्पेशल आहेस असे असे संस्कार करण्यास पालक जवाबदार असतात ..घरातील मुलीच्या .. मनावर आपण अबला आहोत ..दुय्यम आहोत ..पुरुषी आधाराची आपल्याला गरज आहे ..पुरुष अधिक कर्तुत्ववान असतात ..अधिक शक्तिमान असतात ..असे कळत नकळत बिंबवले जाते ...जणू असे त्यांच्या मनावर बिंबवून त्यांना पुढे त्यांच्यावर होऊ शकणाऱ्या संभाव्य अन्यायाला सहन करण्यास त्यांनी तयार करावे असाच हेतू असतो .. अगदी खाण्यापिण्याच्या वस्तूपासून ते ...कपडेलत्ते ..खेळ..घरातील कामे ..या सर्व बाबतीत मुलींच्या वेगळेपण वाट्याला येते ..त्यांतूनच स्त्रिया अधिक अधिक सहनशील होत जातात ..काही सामाजिक प्रथा देखील हे वेगळेपण अधिक ठळक करतात ..ज्यात मुलीच्या लग्नासाठी वर संशोधन ..हुंडा ..मानपान ..सासरच्या मंडळींचा लग्नकार्यातील वरचष्मा ..जावयाचे रुसणे ..या सर्व बाबीतून त्या मुलीवर आणि तिच्या पालकांवर जणू उपकारच केले जात आहेत असे भाव असतात खरे तर घरात सकाळी सगळ्यात आधी कोण उठते आणि सगळ्यात शेवटी कोण झोपते याचा विचार केल्यास ..घरातील स्त्री सगळ्यात आधी उठते आणि रात्री सर्वात उशिरा तीच झोपते .हे उत्तर मिळेल ...म्हणजे घरात अगदी सकाळी लवकर उठून घरच्या सदस्यांसाठी चहा करण्यापासून तिची जवाबदारी सुरु होते .. रात्री सगळ्यात शेवटी ..झाकपाक करणे.. दारे खिडक्या लावणे ..दिवे बंद करणे ..सटरफटर वस्तू जागेवर ठेवणे ..अशी सर्व कामे स्त्री कडेच सोपवली जातात ..ज्या घरात स्त्री देखील पुरुषांच्या जोडीने अर्थार्जनासाठी नोकरी करते तेथे देखील अगदी थोड्याफार फरकाने हेच दिसते ..कामाचा झपाटा ..उरक ..नीटनेटकेपणा ..टापटीप ..या बाबतीतही.. स्त्री अग्रेसर असते ..घरातील पुरुषांच्या कामाच्या ..शाळा कॉलेजच्या वेळा सांभाळून त्यांना तयारीसाठी मदत करणे ..अशी शेकडो कामे स्त्रिया विनातक्रार करत असतात .त्यांना लहानपणापासूनच या साठी तयार केले जाते .. तरीही योग्य मान सन्मानाच्या बाबतीत त्यांना डावलले जाते ..त्यांच्या मताला बहुधा दुय्यम स्थान असते ..वर स्त्री च्या नशिबाला हे भोग असतातच असे सांगितले जाते ..स्त्री ला जरी ' देवी ' चे अथवा ' शक्ती ' चे स्थान दिले गेले असले तरी व्यवहारात मात्र तिची ' शक्ती ' अथवा ' दैवी ' पण क्षीण करण्यास पुरुषच जवाबदार असतो ..आपण पुरुषांनी या बाबत गंभीरपणे विचार करून स्त्री बद्दल योग्य आदर बाळगणे शिकले पाहिजे . तसेच आसपासच्या पुरुषांना विचार करण्यास भाग पाडले पाहिजे ..म्हणजे आपोआप स्त्री वर होणारे कौटुंबिक व सामाजिक अन्याय.. अत्याचार कमी होतील..

स्त्री कडे केवळ एक उपभोग्य वस्तू ..अथवा ' यंत्र ' या भावनेतून न पाहता जर एक संवेदनशील मानव म्हणून आपण पहिले तरच तिच्या त्यागाची ..कष्टाची ..समर्पणाची नीट कल्पना येवू शकते. स्त्री वरील मालकी हक्काच्या भावनेतूनच ' योनिशुचिता ' हा प्रकार जन्माला आलाय ..त्याचा संबंध थेट स्त्री च्या चारित्र्याशी आणि पुरुषाच्या इभ्रतीशी जोडला जातो ...स्त्री च्या गर्भाशयाकडे जाणाऱ्या योनीमार्गाच्या तोंडाशी एक पातळसा पडदा असतो ( हायमेन ) ज्याच्या संबंध स्त्रीच्या " शीलभंगा " शी जोडला गेलाय ..प्रथम संभोगाच्या वेळी... अथवा एखाद्या हलक्याश्या धक्क्याने ..अथवा छोट्याश्या अपघाताने देखील हा पातळ पडदा फाटू शकतो ज्यावरून ..त्या स्त्री च्या चारित्र्याची परीक्षा केली जाण्याचा प्रघात अजूनही काही ठिकाणी आढळत जाते ...खरे तर ' चारित्र्य ' ही संज्ञा केवळ योनीमार्गातील पातळ पडद्याच्या भंग होण्याशी जोडणे निव्वळ मूर्खपणा आहे ..एखाद्या स्त्री चे संसारातील समर्पण ..कुटुंबासाठी केलेला त्याग ..तिने उपसलेले कष्ट ..तिचे एकंदरीत वर्तन..कर्तुत्व ..या गोष्टीना जास्त महत्व असले पाहिजे .. संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे ' स्त्रियश्चारीत्रम ..पुरुषस्य भाग्यं .." असा ..ज्याचा अर्थ असा आहे की स्त्री चे चारित्र्य आणि पुरुषाचे भाग्य हे देव देखील समजू शकत नाहीत ..तर मानवाला कसे कळणार ? ..या श्लोकात चरित्र हा शब्द केवळ ' शील ' या अर्थाने घेतला जातो .. ..खरे तर या श्लोकाद्वारे कदाचित हेच सूचित केले गेलेय की स्त्री ला लहानपणापासून अनेक विकारी पुरुषांना तोंड द्यावे लागत असल्याने ..मामा ..काका ..वडील ..भाऊ..चुलत ..आते ..वगैरे नात्यात अथवा आसपास वावरणाऱ्या पुरुषांपासून ..स्त्री शरीराला अनेक धोके असतात ..तिच्या असहायतेचा..सहनशीलतेचा ..भाबडेपणाचा ..माफ करण्याच्या वृत्तीचा कोण कसा फायदा घेईल हे सांगणे कठीण आहे ..त्यामुळे तिच्या शिलाची नेमकी खात्री देता येणे कठीण आहे ..त्याबाबत जास्त बाऊ करू नये ..ते सगळे सहन करून .. सगळे पचवून ..केवळ मनात ठेवून स्त्री वावरत असते ..जर तिने वाच्यता केली तरी दोष तिच्याकडेच जातो ..समाज तिच्याकडेच वाईट नजरेने पहातो...म्हणून ती कोणाला काही न सांगता मनात ठेवते ..आणि तिचे चरित्र कोणाला समजू शकत नाही ..वेगळ्या दृष्टीकोनातून पहिले तर हा श्लोक उलटा असला पाहिजे.. पुरुषस्य चरित्रं .. " असा . कारण पुरुष लैंगिकतेच्या बाबतीत अधिक आक्रमक ..किवा शारीरिक संबंधाना अधिक प्राधान्य देणारा असतो .

( बाकी पुढील भागात )

वंशाचा दिवा ..कुलदीपक ..वगैरे !

वंशाचा दिवा ..कुलदीपक ..वगैरे ! ( बेवड्याची डायरी - भाग ६५ वा ) 

कामतृप्तीच्या क्षणाबाबत सर माहिती सांगत असताना एकाने प्रश्न विचारला " सर काम वासना जादा मात्रा में स्त्री में होती है या पुरुष मे ? जरा विचित्रच प्रश्न होता त्याचा ...सर काय उत्तर देतात याबाबत मला कुतूहल होते ..' लैंगिक प्रेरणा ही नैसर्गिक असते ..तसेच स्त्री व पुरुष या दोहोंमध्ये ही प्रेरणा उपजत आढळते ..लैंगिकता हे आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे ..हे मी पूर्वीच सांगितले आहे ...स्त्री- पुरुष दोघांना शरीर संबंधांची गरज असते ..तसेच ' कामतृप्ती ' चा तो अदभूत क्षण अनुभवणे दोघांनाही आवडते ..हवे असते ..या समान बाबी आहेत ..कामवासना किवा शरीर संबंधांची वासना जास्त कोणात असते हा प्रश्नच उद्भवत नाही ..तरीही या बाबत पुरुष जास्त अधीर ..उतावळा .असतो असे सांगता येईल ..निसर्गतः विचार केला तर ..खूप पूर्वी जेव्हा संतती नियमनाची साधने उपलब्ध नव्हती ..लोकसंख्या वाढीची समस्या नव्हती ..तेव्हा पासून विचार केला तर ..शरीर संबंधांची शारीरिक गरज असूनही ..स्त्री या बाबत अधिक सावध असणे स्वाभाविक असे ..कारण शरीर संबंधानंतर जेव्हा गर्भ धारणा होई तेव्हा स्त्री ची जवाबदारी वाढत असे ..तिला गर्भ सांभाळणे ..योग्य ती काळजी घेणे ..प्रसुतीवेदना सहन करणे ..झालेल्या अपत्याचे संगोपन करणे ही सगळी पुढील कामे करावी लागत असत ..पुरुषाला केवळ झालेल्या अपत्यांचे पालनपोषण करण्यासाठी हातभार लावण्याचे काम होते .. त्या काळी एकेका जोडप्याला आठ ते दहा ..आणि त्यापेक्षाही जास्त अपत्ये असत ..अगदी वर्षाला एक अपत्य असाही प्रकार घडत असे ..त्यावेळी कल्पना करा की इतकी मुले सांभाळणे ..मुले मोठ होईपर्यंत सर्वांची समान काळजी घेणे ही मोठीच जवाबदारी स्त्री वर असे ..त्याकाळी स्त्रियांना शारीरिक आणि मानसिक त्रास किती भोगावे लागत असतील ?

त्यामुळे त्या काळी स्वभाविकपणे अनेक स्त्रियांना वारंवार शरीर संबंध म्हणजे एकप्रकारची शिक्षाच वाटल्यास नवल नाही ..हल्लीची काळात संतती नियमनाची साधने उपलब्ध असल्याने ..लोकसंख्या नियंत्रणा बाबत जागृती वाढल्याने ही समस्या उरलेली नाहीय ..तरीही मानसिक दृष्ट्या विचार केलातर शरीर संबंधांची ओढ स्त्री च्या तुलनेत पुरुषांच्या मनात अधिक असते ..तसेच प्रेम किवा प्रणयाच्या दोघांच्या कल्पना थोड्या भिन्न आढळतात ..आपल्या आवडत्या व्यक्तीने जास्तीत जास्त वेळ आपल्या सहवासात रहावे ...त्याच्याशी गप्पा माराव्यात ..हितगुज करावे ..आपली स्तुती करावी ..आपल्या कामाचे कौतुक करावे ..या सर्व गोष्टीं स्त्री ला मनापासून आवडतात ..आणि या सर्व गोष्टींचा परीपाक म्हणून ..अगदी शेवटी लैंगिक उत्तेजना आल्यावर...सहज शक्य झाल्यास ..पुरेसा एकांत लाभल्यास ..शरीर संबंध व्हावेत असे स्त्री ला वाटते ..जास्तीत जास्त वेळ आपल्या आवडत्या स्त्री चा अथवा जोडीदाराचाचा सहवास ..तिच्याशी हितगुज ..गप्पागोष्टी..यात वेळ घालवणे बहुधा पुरुषांना भावत नाही ..आपले काम लवकरात लवकर कसे साध्य करता येईल या कडे त्याचे अधिक लक्ष असते ..किवा त्याचे सर्व बोलणे ..हालचाली केवळ शरीर संबंधांच्या दिशेने असतात ..अनेकदा स्त्री ला शरीर संबंध नको असतात ..तरी केवळ आपल्या आवडत्या पुरुषाने आपल्यापासून दूर जावू नये म्हणून स्त्री त्याला शरीर समर्पित करते ..म्हणजे कामवासनेचे नियंत्रण पुरुषांपेक्षा स्त्री कडे जास्त असते असे म्हणता येईल ...म्हणूनच निसर्गाने पुरुषाच्या शरीर संबंध करण्याच्या क्षमतेवर काही मर्यादा घातल्या आहेत ..पहिली मर्यादा म्हणजे लिंगाला उत्तेजना आल्याशिवाय शरीर संबंध करणे पुरुषाला अशक्यप्राय असते ..दुसरी मर्यादा म्हणजे ...एकदा शरीर संबंध होऊन स्खलन झाल्यावर पुन्हा लिंग उत्तेजने साठी लागणारा वेळ ....तिसरी मर्यादा म्हणजे एका दिवसात एका पुरुषाला जास्तीत जास्त म्हंटले तर तीन ते चार वेळाच लिंग उत्तेजित होऊन शरीर संबंध करता येणे ..अर्थात तरीही अनेक पुरुष शरीर संबंधाबद्दल एकमेकांकडे बढाया मारताना आढळतात .. विनोद असा की काही जण तर एका दिवसात आठ ते दहा वेळा शरीरसंबंध केला असे सांगून उगाचच आपला पुरुषार्थ वाढवून सांगतात ..जर निसर्गाने या मर्यादा पुरुषावर घातल्या नसत्या तर पुरुष कामधंद्यासाठी देखील घराबाहेर पडला नसता ..सरांनी हे सांगून स्पष्ट केले होते की ,,कामवासनेच्या बाबतीत पुरुष जास्त पुढाकार घेणारा असतो ..तुलनेत स्त्री अधिक संयमी असते ..

जरी निसर्गाने स्त्री व पुरुष यांचे एकमेकांच्या जीवनात समान स्थान निर्माण केलेले असले तरी पुरुषाने केवळ पुरुषी अहंकारामुळे स्त्री ला कमी लेखणे सुरु केले ..तिच्यावर अनेक निर्बंध लादले.. ते केवळ स्त्री ने आपल्या अधिपत्याखाली रहावे या भावनेने ..हे निर्बंध लादण्यामागे असुरक्षितता आणि अनेक प्रकारचे न्यूनगंड ..कारणीभूत आहेत ..स्त्रीकडे केवळ देह्भोगाचे एक साधन म्हणून पहिले गेल्याने समाजात अजूनही स्त्री अत्याचाराच्या घटना वाढत आहेत..खरेतर चिकाटी ..सहनशीलता ..मनाचे नियंत्रण.. या बाबतीत स्त्रिया निसर्गतः पुरुषांपेक्षा पुढे आहेत ...तरीही जास्तीत जास्त लोकांना आपल्याला मुलगा व्हावा असे वाटते ..आणि कन्या नको असते..त्यासाठी वंशाला दिवा ..कुलदीपक अशी अनेक धार्मिक परंतु अशास्त्रीय करणे पुढे केली जातात ..खरेतर व्यसनाच्या आहारी जाण्यात ..गुन्हेगारी करण्यात ..अन्याय ..भ्रष्टाचार....हिंसा करण्यात जास्तीत जास्त पुरुषवर्ग आढळतो ..इथे व्यसनमुक्ती केंद्रात सगळे कुलदीपक .वंशाचे दिवे आलेले आहेत ..कारण लहानपणापासून पुरुषांना वेगळ्याप्रकारे वाढवले जाते ..स्पेशल लाड होतात ..कमी निर्बंध लादले जातात .

( बाकी पुढील भागात )

कामतृप्तीचा कालावधी ? ? ? ?

कामतृप्तीचा कालावधी ? ? ? ?  ( बेवड्याची डायरी - भाग ६४ वा )

आपल्या जोडीदाराच्या भावनांची काळजी घेणे हे मानवी शरीर संबंधात अतिशय महत्वाचे आहे ..अनेक जोडप्यांना लग्नानंतर काही वर्षांनी एकटेपणा जाणवणे ..कोणातरी एकाला शरीर संबंधांचा उबग येणे ..अथवा या व्यक्तीशी लग्न करून आपण फसलो..अशी भावना मनात एकमेकांच्या निर्माण होण्याचे हेच कारण असावे ..किवा दुसऱ्या व्यक्तीकडे आपला जोडीदार आकर्षित होण्यास देखील हा ..भावनिक दुरावा कारण बनू शकतो होऊ शकते ..लग्नानंतरच्या सुरवातीच्या काळात एकमेकांवर खूप प्रेम असणारी अनेक जोडपी ...लग्नानंतर सुमारे १५ वर्षांनी ..एकमेकांबद्दल नाखूष असतात...आपल्या जोडीदाराचे आपल्यावर पूर्वीसारखे प्रेम राहिले नाही असे त्यांना वाटत राहते ...केवळ आपल्या जोडीदाराला आपण भरपूर शरीरसुख देतो अथवा त्याला पैसे ..दागिने ...नोकर चाकर ..उपलब्ध करून दिले की जोडीदार एकनिष्ठ राहील ..हा एकमेव निकष येथे लावता कामा नये ..कामतृप्ती हा सुखी संसाराचा एक पैलू असू शकतो ..मात्र त्यावरच संसार टिकून राहील..सुखी होईल याची खात्री बाळगणे चूक ठरू शकते ..प्रत्यक्ष शरीर संबंधांच्या वेळी स्त्री - पुरुषांचा " कामतृप्ती " गाठण्याचा क्षण वेगवेगळा असू शकतो ..याचे कारण पुरुष लवकर उत्तेजित होत असल्याने तसेच उतावळा असल्याने ..त्याला हा क्षण गाठणे सोपे असते ..तर स्त्री ला उत्तेजित होण्यास पुरुषाच्या तुलनेत जास्त वेळ लागतो ..म्हणून पूर्व प्रणय आवश्यक असतो ..जेणे करून आपल्या जोडीदाराला शरीर संबंधांसाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या तयार करता येते ..सर पुढे माहिती देत असताना एकाने हात वर करून प्रश्न विचारला " सर ..शरीर संबंधात " कामतृप्ती " चा क्षण गाठण्यास किती वेळ लागतो ? "..

" तसे पहिले तर नैसर्गिक व शास्त्रीय दृष्ट्या योग्य उत्तेजित आल्यावर ..प्रत्यक्ष शरीर संबंध सुरु झाल्यावर ..म्हणजेच लिंगाने योनिप्रवेश केल्यावर ..सर्वसाधारण अवस्थेत तीन ते चार मिनिटात " कामतृप्ती ' चा क्षण दोघानाही गाठता येतो ..अर्थात येथे नैसर्गिक व शास्त्रीय दृष्ट्या योग्य उत्तेजित झाल्यावर..हा शब्द अतिशय महत्वाचा आहे ..उत्तेजनेच्या बाबतीत लिंगाला पुरेशी ताठरता येणे हा निकष येथे पुरुषांच्या बाबतीत आहे तर ..उत्तेजित झाल्यावर लिंगाला सहजगत्या योनी प्रवेश करू देण्यास योनीस्त्राव पाझरणे हा निकष " स्त्री " च्या बाबतीत बाबतीत लागू पडतो ..गम्मत अशी की अनेकदा पुरुष स्वताच्या उत्तेजनेची काळजी घेतो नीट ..कारण लिंगाला ताठरता आल्याशिवाय लिंगाचा योनी प्रवेश होणे अशक्यप्राय असते ..मात्र स्त्री च्या बाबतीत योनीस्त्राव सुरु झाला आहे अथवा नाही याची तो खात्री करून न घेता ..शरीर संबंध सुरु करतो अशा वेळी त्याला योनीप्रवेश करण्यास अवघड जाते ..जास्त बळाचा वापर करावा लागतो ...जोडीदार स्त्री ला त्यामुळे वेदना होऊ शकतात ..अशा शरीर संबंधात पुरुषाच्या ' कामतृप्ती ' चा क्षण त्याल गाठता येतो ..मात्र जोडीदार स्त्री हा क्षण गाठू शकत नाही ..किवा शरीर संबंधांची पुरुषाने घाई केल्यास ..स्त्री नेमकी उत्तेजित होत असतानाच पुरुषाचे स्खलन होऊन तो ..जोडीदार स्त्री ला त्या क्षणापासून वंचित ठेवतो ..अतृप्त ठेवतो ..येथे लिंगाचा आकार ..लांबी ..रुंदी या बाबी गौण असतात ..अनेक लोकांच्या मनात ब्लू फिल्मस पाहून ..अथवा अशास्त्रीय पुस्तके वाचून.. लिंगाच्या आकाराच्या बाबतीत किवा शरीर संबंधांना लागणाऱ्या वेळेच्या बाबतीत गैरसमज अथवा न्यूनगंड तयार होतात ..आपल्या लिंगाच्या आकाराची तुलना ब्लू फिल्म मध्ये काम करणाऱ्या पुरुषाच्या लिंगाच्या आकाराशी करणे अथवा शरीर संबंधाचा वेळ वाढवण्यासाठी दारू किवा अन्य मादक द्रव्यांचा वापर करणे अयोग्य आहे .. योग्य पद्धतीने उत्तेजित झाल्यावरच ...दोघांनाही कामतृप्तीचा तो चरम क्षण गाठणे सहज शक्य होते ..

दारू अथवा अन्य मादक द्रव्यांचे सेवन करून .. जास्तवेळ शरीर सुखाचा आनंद मिळतो हा मोठा गैर समज आहे ..दारूच्या बाबतीत इंग्रजीत एक वाक्य असे म्हंटले आहे आहे की " अल्कोहोल इंक्रीजेस डिझायर ..बट डीक्रीजेस परफाॅरमन्स " म्हणजे इच्छा वाढते मात्र कृतीत व्यक्ती कमी पडते ..अर्थात हे वाक्य अगदी थोडी अथवा क्वचित दारू पिणाऱ्या व्यक्ती लागू पडत नाही ..मात्र दारूच्या आहारी गेलेल्या व्यसनीना तंतोतंत लागू पडते .. व्यसनी झाल्यावर लिंगाची पुरेशी उत्तेजना अथवा लिंगाला ताठरता येणे बंद होते ..किवा तात्पुरती अथवा कायमची नपुंसकता येते ..तसेच त्याचे स्खलन अगदी काही क्षणातच होऊ लागते ..' शीघ्रपतनाची ' समस्या निर्माण होते . ..अफूजन्य मादक पदार्थांच्या बाबतीत ....म्हणजे ब्राऊन शुगर ..हेरोईन ...किवा माॅर्फिन..अथवा कोकापासून बनेलेले कोकेन या मादक द्रव्यांचे सेवन केल्यावर वेगळा अनुभव असतो ..या द्रव्यांच्या सेवनाच्या सुरवातीच्या काळात जरी उत्तेजना खूप वेळ म्हणजे अगदी अर्धा तास किवा एक तास टिकत असली.. तरी नंतर नंतर अक्षरशः लिंगाला उत्तेजना येणे बंद होते ..अथवा तात्पुरती किवां कायमची नपुंसकता पुरुषाच्या पदरी येवू शकते ..

( बाकी पुढील भागात )

पूर्व प्रणय ...? ? ?

पूर्व प्रणय ...? ? ?  ( बेवड्याची डायरी - भाग ६३ वा ) 

' कामतृप्ती ' ही संकल्पना सर सांगत असताना ..आम्ही सगळे गंभीर झालो होतो ..आपल्या जोडीदाराच्या भावनांची पर्वा न करता केलेला शरीर संबंध हा ' बलात्कारच ' ठरतो हे सरांनी सांगितल्यावर ..मला अनेक प्रसंग आठवले जेथे ..दारू पिवून मी पत्नीशी प्रणय केला होता ..अगदी ' हनिमून ' च्या दिवशी देखील ..मित्रांच्या आग्रहावरून मी गुपचूप बियर प्यायलो होतो .. जवळ जाताच पत्नीने " कसलातरी आंबूस वास येतोय " हे मला बोलून दाखवले होते ..मी तिला तुझे काहीतरीच असते असे म्हणून उडवून लावले होते .. नंतर सराईत पिणारा झाल्यावर तर प्यायल्याशिवाय आपल्याला शरीरसंबंध करताच येणार नाही.. अशी भावना मनात पक्की रुजली होती ..त्यामुळे पत्नीच्या नाक मुरडण्या कडे निर्लज्ज पणे दुर्लक्ष करून मी स्वताचा स्वार्थ साधत गेलो...तिने विरोध केल्यावर देखील मी अनेकदा माझा नवरेपणाचा हक्क बजावला होता ..इतकेच नव्हे तर .." हल्ली तुझी हवी तशी साथ मिळत नाही " असा टोमणाही मारला होता ..आता सगळे आठवून प्रचंड शरम वाटत होती स्वता:ची ..वाटले जर पत्नीने नवऱ्याविरुद्ध बलात्काराची केस टाकायची ठरवले तर ??? ..पुरुषांच्या सुदैवाने स्त्रिया असे करत नाहीत ..संसारातले त्यांचे समर्पण त्यांना बांधून ठेवते ..शिवाय ' पती परमेश्वर ' हा संस्कार त्यांच्या मनावर लहानपणापासून बिंबवला गेल्याने ...त्या वारंवार माफ करतात पतीला..एक व्यक्ती म्हणून देखील मी अनेकदा पत्नीचा अपमान केला होता ..तिच्या कार्यक्षमतेवरून ..तिच्या नातलगांवरून ...टोमणे मारले होते...बावळट..मूर्ख ..बेअक्कल ..ही विशेषणे तरी नेहमीची होती .. बिचारीकडे एकमात्र शस्त्र उरले होते...रडण्याचे ..अबोला धरण्याचे .. एखादा दिवस स्वैपाक न करण्याचे ..जास्तीत जास्त काय तर रागावून एकदोन दिवस माहेरी जाण्याचे ...आता या पुढे पत्नीच्या भावनांची काळजी घ्यायची असे मी मनात ठरवले ..

सर पुढे सांगू लागले ..प्रत्यक्ष प्रणय करण्यापूर्वी आपल्या जोडीदाराशी पेमळ संवाद करणे ..गोड बोलणे..त्याची स्तुती करणे ..त्याच्या चिंता ..काळज्या जाणून घेणे ..विशिष्ट ठिकाणी स्पर्श करून जोडीदाराला उत्तेजित करणे .. या सगळ्या गोष्टी ' पूर्व प्रणय ' ( फोरप्ले ) या सदरात मोडतात ..तर स्खलन झाल्यावर ..जोडीदाराचे .थोपटून ..कुरवाळून ..आभार व्यक्त करणे ..आपण एकमेकांचे सुख दुखा:चे साथीदार आहोत याची जाणीव करून देणे..त्याच्या विवंचना समजून घेणे ..काही काळ मृदू संवाद करणे हे सगळे ( आफ्टर प्ले ) या प्रकारात येते .. ज्यामुळे भावनिक बंध दृढ राहण्यास मदत होते ..बहुतेक पुरुष पूर्वप्रणया बाबत जागरूक असतात ..परंतु पश्चात प्रणयाबाबत बेफिकीर असतात ..आपला कार्यभाग उरकला की ते जोडीदाराकडे पाठ फिरवतात ..जरी स्त्रिया बोलून दाखवत नसल्या तरी ' कामापुरते गोड बोलून आपला वापर केला गेलाय " ही भावना त्यांच्या मनात येवू शकते ..मोठ्या शहरातून जागेच्या कमतरतेमुळे ..पुरेसा एकांत नसल्याने हे सर्व साग्रसंगीत शक्य होत नाही ..बहुतेक वेळा शरीरसंबंध ही एक तडजोड बनते ..तरीही शक्य होईल तेव्हा या गोष्टींचे भान ठेवणे गरजेचे असते ..

" किती लोक महिन्यातून एकदा का होईना आपल्या पत्नीसाठी आठवणीने गजरा आणतात ? " सरांनी अचानक सर्वाना प्रश्न विचारला..आम्ही सगळे एकमेकांकडे पाहत होतो ..फक्त एक दोन हात वर झाले ..हात वर केलेल्या एकाला सरांनी विचारले " गजरा आणला तेव्हा दारू पिवून होता का तुम्ही ? " त्याने होकारार्थी मान हलवली ..सगळे मोठ्याने हसले ..सर स्मित करून म्हणाले ..म्हणजे तुम्ही आणलेला गजरा ' लाच ' या सदरात मोडतो ..पत्नीने आपण दारू प्यायल्याबद्दल कटकट करू नये ..बडबड करू नये ..म्हणून तिला चूप करण्यासाठी ..दारू पितो तरी तुझ्यावर माझे प्रेम आहे हे दर्शवण्यासाठी तिला ' लाच ' म्हणून ' गजरा ' किवा मिठाई ..तिच्या आवडीच्या इतर वस्तू आपण खरेदी करून आणतो ..दारू न पिता ..पत्नीच्य आनंदासाठी शक्य होईल तेव्हा गजरा आणणे ...तिला महिन्यातून एकदा का होईना बाहेर फिरायला नेणे ..हॉटेलिंग करणे ..सिनेमाला जाणे या गोष्टी भावनिक बंध अधिक दृढ करतात .." सर लेकीन मै घर मे पत्नी के पास ऐसे खर्चे के लिये पैसे देता हु ..वो जो चाहे खर्च कर सकती है " एक जण उद्गारला .." अहो पण केवळ पत्नीला भरपूर पैसे देवून तिची भावनिक गरज पूर्ण होत नाही ..एकटे फिरायला जाणे ..खरेदीला जाणे ..हे स्त्रियांना बहुधा मनापासून आवडत नाही ..आपला पती सोबत असेल तर त्यांच्या चित्तवृत्ती अधिक बहरतात ..हे सगळे मानसिक पातळीवर समजून घ्यायला हवेय ..केवळ पत्नीजवळ भरपूर पैसे दिले की काम भागले असे मानणे हा ' व्यवहार ' झाला ..संसार नाही !

( बाकी पुढील भागात )

Monday, September 8, 2014

खरा पुरुषार्थ !

खरा पुरुषार्थ !  ( बेवड्याची डायरी - भाग ६२ वा ) 

आपण आता एकंदरीत नैसर्गिक दृष्टीने लैंगिकतेचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न केलाय ..लैंगिकता हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे हे जाणून घेतानाच शरीर संबंध म्हणजे नेमके काय ..त्या मागील जवाबदारी ..लैंगिक तृप्ती म्हणजे काय ..त्याबाबतचे गैरसमज ..त्याबाबतची स्त्री -पुरुषांची मानसिकता इत्यादी गोष्टींबाबत देखील जाणून घेतले पाहिजे ..असे सांगत सरांनी फळ्यावर ..' कामतृप्ती ' हा शब्द लिहिला ..सगळ्यांच्या भुवया उंचावल्या ..मग सरांनी प्रश्न विचारला कोणी सांगू शकेल का याचा अर्थ ? आता या विषयाबाबत चांगलाच मोकळेपणा आलेला असल्याने चारपाच हात वर झाले ..' सर कामतृप्ती म्हणजे शरीर संबंधांचा शेवट असतो ..' एकाने सांगितले .." सर कामतृप्ती म्हणजे लैंगिक सुखाची चरम अवस्था " .." कामतृप्ती म्हणजे वीर्य स्खलनाची अवस्था " वेगवेगळी उत्तरे येत होती .." अगदी बरोबर तुम्ही योग्य दिशेने विचार करत आहात ..मात्र बहुतेक वेळा " कामतृप्ती " ही संज्ञा एकांगी अथवा एका बाजूने विचार करूनच लक्षात घेतली जाते ..शरीर संबंधातील लैंगिक उत्तेजनेचा आनंददायी शेवट ..वीर्य स्खलनाचा व अत्युच्च शारीरिक व मानसिक आनंद मिळवून देणारा क्षण म्हणजे ' कामतृप्ती ' असे म्हणता येईल ...येथे स्त्री - पुरुष या दोघांचा मानसिक व शारीरिक आनंदाचा विचार असला पाहिजे ...त्या साठी स्त्री पुरुषांची मने प्रसन्न असली पाहिजेत ..हवा तसा एकांत पाहिजे ..मुख्य म्हणजे आपल्या जोडीदाराच्या कामतृप्तीचा देखील विचार असला पाहिजे ..जर आपल्या जोडीदाराचे मन दुखी: असेल ..चिंताग्रस्त असेल ..निराश असेल ..तर आपल्या सोबत तो अत्युच्च आनंदाचा क्षण जोडीदार अनुभवू शकणार नाही ..व्यसनी व्यक्तीच्या बाबतीतच नव्हे तर सर्वसामान्य पुरुषांच्या बाबतीत देखील या बाबतचे शास्त्रीय ज्ञान नसल्याने ..बहुधा जोडीदाराच्या आनंदाचा विचार पुरुष करत नाहीत ..शरीर संबंध म्हणजे स्त्री च्या दृष्टीने केवळ एक वैवाहिक जवाबदारी ..अथवा नावडीचे कर्म उरते

निसर्गतः स्त्री व पुरुष यांच्या लैंगिक उत्तेजनेच्या आणि लैंगिक तृप्तीच्या बाबतीत काही फरक आहे ..या बाबत महेश मांजरेकर यांच्या ' प्राण जाये पर चाॅल ना जाये " या चित्रपटात दाखवलेले दोन प्रसंग अतिशय मार्मिक आहेत ..एका प्रसंगात ..बेकार ..नोकरी न करणारा ..रिकामटेकडा असा नवरा दाखवला आहे ..जो लग्न झाल्यावर काही काम धंदा न करता सासऱ्याच्या घरी राहत असतो .छोट्याशा चाळीत असलेल्या सासऱ्याच्या खोलीत सासू सासरा ..मेव्हणा .आणि हे दोघे नवरा बायको राहत असतात ..शरीर संबंधांसाठी हवा तसा एकांत मिळू शकत नाही ..मात्र कामपिपासू नवरा एके दिवशी रात्री आसपास सगळी मंडळी झोपलेली असताना निर्लज्ज होऊन पत्नीशी जवळीक करण्याचा प्रयत्न करतो ..पत्नी लज्जेमुळे ..त्याला नकार देते ..यावर तो आरडा ओरडा करतो ..घर डोक्यावर घेतो ..पत्नीवर वाट्टेल ते आरोप करतो ..तिच्या चारित्र्यावर चिखलफेक करतो ..शेवटी सासू सासरा जागे होतात ..ते या कामपिसाट जावयाची समजूत घालतात ..आम्ही दोघे बाहेर गॅलरीत जातो झोपायला असे म्हणून ..जावयाला एकांत उपलब्ध करून देतात ..त्यावेळी त्या पत्नीच्या चेहऱ्या वरचे ओशाळलेले ..व्यथित झालेले ..भाव अतिशय करूण आहेत.. दुसऱ्या एका प्रसंगात दारुडा पती ..दारूच्या नशेत पत्नीशी शरीर संबंध ठेवतोय ..त्याच वेळी ..ती त्याला तिच्या अडचणी ..संसारिक चिंता ..त्याच्या दारूमुळे घरात आलेली विपन्नता ..तिला बाहेर काम करताना येणाऱ्या अडचणी वगैरे बाबत सांगू इच्छित आहे ..मात्र याचे सगळे लक्ष स्वताच्या कामतृप्ती कडे आहे ..तो तिला चूप बस म्हणून रागावतो ..हे नंतर बोलू असे म्हणून आपला कार्यभाग सुरु ठेवतो ..आणि आपले काम साधल्यावर पत्नीच्या शेजारी नशेत गाढ झोपी जातो ..शेवटी कॅमेरा स्त्री च्या चेहऱ्यावर आहे ..तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळताना दाखवले आहेत ..अतिशय सुन्न करणारे हे दोन्ही प्रसंग आहेत ..अंतर्मुख व्हायला लावणारे ..मात्र खंत अशी की हे प्रसंग सुरू असताना थेटर मध्ये ..त्या पुरुषांच्या निर्लज्ज पणाला लोक दाद देवून शिट्ट्या वाजवत होते ..हसत होते विनोदी प्रसंग असल्यारखे ..त्या स्त्रियांच्या मानसिकतेचा विचार बहुधा झाला नाही ..किवा शेवटी त्या पत्नीच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू कोणाला बोचले नाहीत .

वरील प्रसंग सरांनी अशा पद्धतीने सांगितले की आम्हाला सगळ्यांना हळहळ वाटली ..काही क्षण सगळे स्तब्ध झालो ..खरेच कामतृप्ती एकांगी कल्पना नाहीय ..केवळ शारीरिक पातळीवर अनुभवण्याची प्रक्रिया नाही ...ते एक मंगल मिलन असते ..स्त्री चे समर्पण असते ..अत्युच्च आनंदाचा सोहळा असतो ..त्यामागे स्त्री च्या मानसिकतेचा विचार असलाच पाहिजे असे वाटू लागले ..केवळ शरीर संबंध ठेवण्यास पात्र असणे अथवा अपत्य प्राप्ती होणे हा पुरुषार्थ नव्हे ...संसाराच्या जवाबदारया स्वीकारणे ..आपल्या जोडीदाराला जास्तीत जास्त आनंदी ठेवणे ..कुटुंबाच्या प्रगतीचा ..विकासाचा विचार करणे.. आपल्या कर्तुत्वाने सगळ्या कुटुंबाला मान सन्मान मिळवून देणे ..या सगळ्या बाबी पुरुषार्थ या संज्ञेत मोडतात हे सरांनी सांगण्याचा प्रयत्न केला होता ..एक व्यसनी व्यसन केलेल्या अवस्थेत ..किवा त्याच्या व्यसनामुळे पत्नी चिंतीत असताना ..घरात अनेक कौटुंबिक ..आर्थिक अडचणी असताना ..शिवाय तोंडाला दारूचा गलिच्छ आंबूस वास येत असताना जेव्हा पत्नीशी शरीर संबंध ठेवतो ..तेव्हा तो त्या स्त्री वर बलात्कारच करत असतो असे वाटू लागले .

( बाकी पुढील भागात )

मालकी हक्काची भावना ..असुरक्षितता !

मालकी हक्काची भावना ..असुरक्षितता !  ( बेवड्याची डायरी - भाग ६१ वा )

लैंगिकता हा फक्त स्त्री - पुरुष यांचा शरीरसंबंध इतकाच विषय नसून ..मानवी संस्कृतीच्या मुळाशी असणारा .अतिशय क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा विषय आहे हे सरांनी स्पष्ट करत या बाबतीत वेगवेगळ्या बाजूनी विचार करणे गरजेचे असल्याचे सांगितले ..आदिमानवांच्या टोळ्यात लग्न हा प्रकार अस्तित्वात नव्हता ..वयात आल्यावर शरीर संबंधांची ओढ जागृत झाली की कोणतीही स्त्री आपल्या आवडत्या पुरुषाशी शरीर संबंध ठेवू शकत असे ..त्यात देखील निसर्ग प्रेरणेनुसार ..अधिक शूर ..बलदंड ..पराक्रमी ..सुदृढ ..पराक्रमी पुरुष निवडला जात असे ..याचे कारण संबंधातून जन्माला येणारे अपत्य हे तसेच पराक्रमी ..आरोग्यपूर्ण असावे अशी स्त्री ची इच्छा असे ..इतर प्राण्यात देखील जोडीदाराच्या निवडीचा हाच निकष मादी लावत असते ..तसेच बहुतेक वेळा एकापेक्षा जास्त पुरुषांशी किवा स्त्रियांशी शरीर संबंध होत असल्याने त्यांतून जन्माला येणाऱ्या... मुलांचे संगोपन जरी निसर्गतः आई कडे असले तरी बाप कोण ही जवाबदारी निश्चित नसे ..तसेच अधिक दुबळ्या असणाऱ्या ..पराक्रमी किवा शूर नसणाऱ्या ..आरोग्यपूर्ण नसणाऱ्या ..अथवा निसर्गतः कमकुवत असणाऱ्या पुरुषांना शरीर संबंधांसाठी स्त्री मिळणे दुरापास्त होत असावे ..म्हणून लग्न संस्था अस्तित्वात आली ..ज्यात जन्माला येणाऱ्या अपत्याचे पालकत्व स्पष्ट होते ..तसेच प्रत्येक पुरुषाला शरीर संबंधासाठी कायमचा जोडीदार मिळत असे ..स्त्रीला आकर्षित करण्यासाठी ..फुला पानांच्या माळा .. हाडांचे दागिने ..भरपूर अन्न ..त्या काळी प्रचलित असणारे धन यांचा वापर सुरु झाला.. येथे हे समजून घेणे गरजेचे आहे ..इतर प्राण्यांमध्ये नर अथवा मादी यांच्यामध्ये शारीरिक सौंदर्य गौण असते ..नराच्या बाबतीत फक्त आरोग्य ..शौर्य ..पराक्रम यांचा विचार होतो ..तर मादीच्या निवडीबाबत ती केवळ एक मादी आहे..प्रजनन योग्य वयात आहे इतकाच निकष आहे ..मानवाच्या बाबतीत पुरुषांच्या दृष्टीने शारीरिक सौंदर्याच्या मापदंडानुसार सुंदर चेहरा ..नाजूक ..शारीरिक दृष्ट्या अधिक आकर्षक अशी स्त्री प्रत्येकाला मिळावी अशी इच्छा असते .. सुंदर स्त्री जोडीदार म्हणून मिळावी असे प्रत्येक पुरुषाला वाटते ..तर पराक्रमी ...शूर ..बलदंड ..देखणा असा पुरुष जोडीदार मिळावा असे प्रत्येक स्त्री ला ..मात्र प्रत्येकाच्या बाबतीत ते शक्य होत नसे..तेव्हा पासूनच स्त्री पुरुषांमध्ये एकमेकांबाबत मालकी हक्काची भावना जागृत झाली ..आपल्या जोडीदाराने दुसऱ्या स्त्री अथवा पुरुषांशी संबंध ठेवू नये या बाबत काळजी घेतली जावू लागली ..याच काळजीच्या पोटी असुरक्षितता निर्माण झाली ..

शारीरक शक्तीच्या बाबतीत बहुतेक स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत कधीक कमकुवत असल्याचा फायदा घेणे पुरुषांनी तेव्हापासूनच सुरु केले असावे ..आपल्या शारीरिक आणि बौद्धिक शक्तीच्या बळावर ..पुरुषांनी तेव्हापासूनच स्त्री ला ताब्यात ठेवण्याच्या वेगवेगळ्या युक्त्या अमलात आणायला सुरवात केली असावी ..तसेच जास्तीत जास्त स्त्रियांशी संबंध ठेवणे अथवा एकापेक्षा जास्त स्त्रियाशी लग्ने करून. त्यांचे पालनपोषण करणे हा देखील एक पुरुषी शौर्याचा मापदंड मानला जावू लागला .. याच्या उलट स्त्री ने मात्र आपल्या पतीशी प्रामाणिक रहावे..पतीला सर्वस्व..मानून एकाच पुरुषाशी एकनिष्ठ राहावे हा संकेत दृढ झाला ..कारण आपल्या हक्काच्या ..आपण लग्न केलेल्या स्त्री ने इतर पुरुषांशी संबंध ठेवणे हे पुरुषी अहंकाराला मानवण्या जोगे खचितच नाही ..अश्या स्त्रीला कुलटा ..व्यभिचारी ..पापी.. असे ठरवले जावू लागले ..योनी शुचीतेच्या कल्पना तेव्हापासूनच अस्तित्वात आल्या असाव्यात ..या उलट एकापेक्षा जास्त स्त्रियांशी संबंध ठेवणाऱ्या पुरुषाला शौर्याचे ..कर्तुत्वाचे ..प्रतिक मानले जावू लागले ..स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाण्याचा इतिहास असा जुनाच आहे ..

( बाकी पुढील भागात )

( ता. क . --हे सगळे माझे चिंतन आहे ..मी कोणी इतिहास संशोधक नाही अथवा थोर ज्ञानी नाही ..माझ्या जाणीवातून जे मला समजले आहे ते मी येथे मांडतो आहे ..त्यामुळे यात काही चुका असल्यास क्षमस्व... तज्ञांनी सुधारणा सुचवल्यास स्वागत आहे ! )

प्रेम की आकर्षण ? ? ? ?

प्रेम की आकर्षण ? ? ? ?    ( बेवड्याची डायरी - भाग ६० वा ) 

निसर्गाने मुळातच शरीर संबंधांची प्रेरणा पुनरुत्पादनाच्या हेतूने केली असल्याने ..शरीर संबंधांबद्दलचे आकर्षण तसेच स्त्री व पुरुष यांची विशिष्ट प्रकारची शरीररचना केली आहे ..या विशिष्ट शरीर रचने सोबतच स्त्री व पुरुष यांची मानसिकता देखील वेगवेगळ्या प्रकारची असते ..स्त्री कडे मातृत्व प्रदान केले असल्याने स्त्री च्या अवयवांची रचना गर्भधारणा होण्यासाठी पूरक तसेच जन्मलेल्या अर्भकाचे योग्य पोषण करण्यास गरजेचे अवयव स्त्रीला दिले गेले आहेत ..या बरोबरच अर्भकाची नीट काळजी घेण्यासाठी... स्त्री मध्ये काही भावनिक वैशिष्ट्ये निर्माण केली आहेत ..त्यात ..माया ..ममता ..सुश्रुषा ..कोमलता ..त्याग ..समर्पण .यांचा समावेश करता येईल ...मानवाच्या बाबतीत अगदी प्राथमिक अवस्थेत पोट भरण्यासाठी शिकार करणे हा एकमेव मार्ग होता ..स्त्री कडे पालनाची जवाबदारी होती तर पुरुषाकडे शिकारीची..वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी लागणारे धैर्य ..चपळाई ..प्राण्याचा जीव घेण्याची निष्ठुरता ..कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठीचे शौर्य ..धाडस हे गुण पुरुषाकडे दिले गेले ..एकप्रकारे शरीर संबंध आणि नवीन निर्माण झालेल्या पिढीचे संगोपन ..पोषण या दोन्ही दृष्टीकोनातून स्त्री व पुरुष यांची शारीरिक व मानसिक जडण घडण केली आहे ...विशिष्ट वयात येईपर्यंत स्त्री व पुरुष यांच्यातील भेद फक्त लिंग पातळीवर व मानसिक पातळीवर असतो ...मात्र वयाच्या १२ ते १८ या वयापर्यंत स्त्री व पुरुष यांच्यात संप्रेरकांच्या बदलामुळे शारीरिक बदल घडू लागतात .गुप्तांगावर केस येणे व चेहऱ्यावर मुरुमे किवा पुटकुळ्या येणे ही प्रक्रिया दोहोंच्या बाबतीत समान आहे ..मात्र आवाज बदलणे ..अधिक आक्रमक आणि साहसी होणे ..स्त्री अनुनयासाठी शोर्य दाखवणे ..वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून स्त्री ला आकर्षित करणे ..शुक्राणूंची निर्मिती.. या प्रकारचे शारीरिक व मानसिक बदल पुरुषांमध्ये तर ..स्तनांना आकार येणे ..गर्भाशयाला आधार म्हणून नितम्बांचा घेर विस्तारणे ..शरीराला विशिष्ट गोलाई प्राप्त होणे .. मसिक धर्म सुरु होणे ..लज्जा ..मोहक विभ्रम ..अधिक हळवेपण ..असे शारीरिक व मानसिक बदल स्त्री मध्ये सुरु होतात ..याच काळात आपल्या आवडीनिवडी बाबत जागृत होणे ...आवडीच्या गोष्टी करण्याचा अट्टाहास ..अधिक संवेदनशील होण्याची प्रक्रिया दोहोंच्याही बाबतीत घडत असते .

तसे पहिले तर विभिन्नलिंगी आकर्षण हे जन्मतः स्त्री पुरुषांमध्ये आढळते ..याचे उदाहरण म्हणजे मुलीला वडिलांचा जास्त लळा असणे तर मुलाला आईचा लळा अधिक असणे हे होय ..वयात आल्यावर हे विभिन्नलिंगी आकर्षण वाढत जाते ..त्यालाच बहुतेक जण प्रेम असे संबोधतात ..खरे तर प्रेम ही संकल्पना फक्त स्त्री व पुरुष यांच्यातील आकर्षणाच्या बाबतीत वापरली जाणे योग्य नाही ..प्रेमात ..त्याग ..आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी वाट्टेल ते कष्ट करण्याची तयारी ..आपल्या आवडत्या व्यक्तीच्या आनंदासाठी प्रसंगी प्राण देण्याची तयारी ..तिची सेवा करण्यात मिळणारा आनंद ..वगैरे गोष्टी असतात ..तसेच प्रेम संकल्पना केवळ स्त्री पुरुष यांच्याशी संबंधित नसून सर्व जीवसृष्टीशी तिचा संबंध असतो ..मनात ' प्रेम ' असलेली व्यक्ती कधीच कुणाची हिंसा करू शकत नाही ..कधीच कोणाचा अपमान करू शकत नाही ..कधी कुणाला दुखवू शकत नाही ..कुणावर अन्याय करू शकत नाही ..आई वडील भावंडे यांच्य्याबद्दल ..स्नेही ..नातलग ..समाज आणि संपूर्ण जीवसृष्टी बाबत आस्था ..जिव्हाळा ..अशा मोठ्या मोठ्या गोष्टी प्रेम या संकल्पनेत समाविष्ट असतात . मात्र केवळ स्त्री पुरुषामध्ये असलेल्या आकर्षणाला प्रेम समजायची हल्ली फॅशन झाली आहे ..जेमतेम १२ वर्षाची मुले मुली सिनेमा पाहून ...कथा कादंबऱ्या वाचून ..प्रेमग्रस्त होतात ..स्वप्नांच्या जगात रमतात ..आपल्या आवडत्या व्यक्तीला सुखी करण्याच्या कल्पना करतात ..त्या पोटी आपले आईवडील ..नातलग ..अशी खरी जिव्हाळ्याची माणसे सोडून द्यायला तयार होतात ही मानसिक अपरिपक्वता आहे ..जरा मनाविरुद्ध घडले की जोडीदार बदलण्यास तयार होतात ..बॉयफ्रेंड ..गर्लफ्रेंड आणि ब्रेकअप हे शब्द तर आताशा तरुण मुले मुली सर्रास वापरताना दिसतात ..मानव हा अधिक विकसित अधिक बुद्धिमान ..इतर प्राण्यांच्या तुलनेत अधिक संवेदनशील प्राणी असल्याने निसर्गाच्या बाबतीत अधिक जवाबदार असतो ..त्यामुळे प्रत्यकाने आपली जवाबदारी समजून वागले तर जगातील अर्ध्या समस्या कमी होतील .

( बाकी पुढील भागात )

Sunday, August 31, 2014

निसर्गाची ऐशीतैशी


निसर्गाची ऐशीतैशी ( बेवड्याची डायरी - भाग ५९ वा ) 


सरांनी चर्चेला घेतलेला ' लैंगिक शिक्षण ' हा विषय सुरवातीला जरी अनावश्यक वाटला होता तरीही ..हा विषय महत्वाचा आहे ..यावर मोकळेपणी चर्चा झाली पाहिजे ..शंकानिरसन झाले पाहिजे ..गैरसमज दूर झाले पाहिजेत असे सर्वाना वाटू लागले ..संडासात उघड्या नटीची फोटो घेवून जावून हस्तमैथुन करतो म्हणून आम्ही त्या तरुणाला हसलो होतो ..मात्र अंतर्मुख झाल्यावर आमच्या ध्यानात आले की बहुधा प्रत्येकाने कधी न कधी ' हस्तमैथुन ' केले होते . एकाने सरांना प्रश्न विचारला ' सर हस्तमैथुन दिवसातून किती वेळा केले म्हणजे नुकसानदायक असणार नाही ? ' सर हसून म्हणाले " छान ..आता तुम्हाला प्रश्न विचारेवेसे वाटत आहेत ..हे पहा सर्वात आधी एक स्पष्ट करणे गरजेचे आहे की लैंगिकता किवा शरीर संबंध अथवा कामतृप्ती हे जरी आपल्या जीवनाचे महत्वाचे आणि अविभाज्य अंग असले तरी लैंगिक संबंध किवा कामतृप्ती म्हणजेच सगळे जिवन नव्हे हे लक्षात ठेवा ...निसर्गाने निर्माण केलेला एक प्रगत ..प्रगल्भ ..वेगवेगळ्या भावना मनात निर्माण होणारा ..सामाजिक भान असणारा ..प्रश्न पडणारा आणि प्रश्नांची उकल करू शकणारा प्राणी म्हणून मानवाची निर्मिती झाली आहे ..आपल्या असामान्य बुद्धिमत्तेचा सकारात्मक वापर करून सर्व जीवसृष्टीचे ..प्राणीमात्रांचे मानवाने संरक्षण करावे हा देखील निसर्गाचा हेतू असला पाहिजे माणूस जन्माला घालण्यामागे ..इतर प्राणी ' आहार , निद्रा , भय , मैथुन या चार गोष्टीनी बांधले गेले आहेत या खेरीज त्यांची बुद्धी काम करत नाही ..मानव एकमात्र प्राणी आहे जो विविध कलाप्रकार ..क्रीडाप्रकार ..मनोरंजनाच्या विविध गोष्टींचा वापर करू शकतो ..तसेच अध्यात्मिकता हे अंग देखील मानवाकडेच दिलेले आहे ..कदाचित या मुळेच मानवाच्या बाबतीत ' नराचा नारायण होणे ' हा वाक्प्रचार वापरला जातो . मात्र मानवाने आपल्या बुद्धीचा वापर केवळ स्वताच्या स्वार्थासाठी ..भोगांसाठी.. सुरु केलाय त्यामुळेच अनेक नैसर्गिक असमतोल निर्माण होत आहेत ..लैंगिक संबंधांची प्रेरणा मनात निर्माण होऊन लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता निर्माण करण्यामागे निसर्गाचा प्रजनन किवा पुनर्निर्माण हा एकमात्र हेतू आहे ..जीव सृष्टीचे अस्तित्व कायम राहावे म्हणून सर्व प्राण्यांमध्ये लैंगिक प्रेरणा निर्माण करण्यात आलेली आहे ..

मानव सोडून इतर सर्व प्राणी लैंगिकतेचा वापर पुनरुत्पादन या एकमात्र हेतूने करतात ..म्हणूनच इतर प्राण्यांचा लैंगिक संबंध विशिष्ट कालावधीतच आणि विशिष्ट प्रकारेच घडतो ..जेव्हा मादी प्रजनन योग्य असते तेव्हाच प्राणी शरीर संबंध करतात ..ते देखील मादीच्या संमतीने ..अल्पवयीन शरीर संबंध किवा बलात्कार हे प्रकार प्राण्यामध्ये नसतात ..वयात आलेल्या मादीचा अनुयय करून ..इतर प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करून ..मगच प्राण्यांना लैगिक संबंध ठेवता येतो ..तसेच एका विशिष्ट वयापर्यंतच म्हणजे प्रजनन योग्य असेपर्यंतच प्राणी लैंगिक संबंध ठेवतात ..मानव मात्र आपल्या इच्छेनुसार ..जबरदस्तीने ..मूड आला म्हणून शरीर संबंध ठेवतो ..प्रजनन क्षमता कमी झाल्यानंतर म्हातारपणी देखील शरीरसंबंधांची लालसा ठेवतो ..तसेच मानवाने आपल्या आनंदासाठी मैथुनाचे विविध प्रकार शोधून काढले आहेत जे काही वेळा निसर्गाच्या नियमांच्या विरुद्ध असतात ..गुदामैथुन हा प्रकार प्राण्यांमध्ये बहुधा नसतो ..शरीर संबंध जरी निसर्गनियमानुसार आवश्यक असले ..गरजेचे असले ..त्यातून मिळणारा आनंदाचा .कामतृप्तीचा भाव कितीही हवाहवासा वाटला तरी..काही नैसर्गिक आणि सामाजिक मर्यादांचे पालन करणे गरजेचे आहे ..



हस्तमैथुन हे लैंगिक संबंधा इतकेच आनंद देणारे माध्यम असले तरी त्याचा अतिरेक नक्कीच हानिकारक ठरू शकतो ..तरुणांनी आठवड्यातून फार तर एकदा हस्तमैथुन करण्यास हरकत नसते ..हस्तमैथुन करणे म्हणजे पाप ..शक्तीनाश ..लिंग वाकडे होणे ..नंपुसक होण्याही शक्यता वगैरे गोष्टी सांगण्यामागे ब्रम्ह्चर्याचा पुरस्कार करण्याऱ्या लोकांचा अतिरेक असू शकतो ..अथवा तरुणांनी हस्तमैथुनाच्या आहारी जावू नये म्हणून घेतलेली काळजी असू शकते " सरांच्या या उत्तराने त्या तरुणाचे समाधान झालेले दिसले . 


लैंगिकतेचा संबंध थेट आपल्या जन्माशी आहे हे आपण जाणतोच त्यामुळे लैंगिकता किवा शरीरसंबंध हे पाप असू शकत नाही ...प्रजननाच्या नैसर्गिक प्रक्रियेत नर - मादी या दोघांचा समान सहभाग असतो ..त्यामुळे निसर्गाने नर आणि मादी हा जन्म दर विशिष्ट ठेवलाय ..मानवाच्या बाबतीत अनेक गैरसमजांमुळे ..पुरुषाला जास्त मोठेपणा देवून स्त्रीला दुय्यम स्थान दिल्यामुळे तसेच वंशाला दिवा वगैरे धार्मिक गैरसमजांमुळे ..हुंडाप्रथा..लग्नासाठी करावा लागणारा खर्च ..अशा सामाजिक कारणांमुळे सध्या प्रत्येकाला आपल्याला मुलगा व्हावा असे वाटते ..त्यामुळेच स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण वाढत आहे ..मित्रानो एक लक्षात घ्या हे निसर्गाला धरून नाही ..येथे विवेक वापरण्याची गरज आहे ..मुलीने जन्म घेवून तिच्यामुळे आईबापाला त्रास होऊ नये म्हणून मुलगी जन्माला येवू द्यायची नाही हा अतिशय स्वार्थी विचार आहे ..त्या ऐवजी जन्माला आलेल्या मुलीला सुरक्षितता मिळावी ..तिला सन्मानाने जगता यावे ..तिच्यावर अन्याय होऊ नये या साठी आवश्यक ते सामाजिक आणि मानसिक बदल करणे जास्त महत्वाचे आहे .. कारण जसा जसा निसर्गातील स्त्री चा जन्मदर कमी होत जाईल तशी तशी पुरुषांना अधिक असुविधा निर्माण होऊ लागेल ..स्त्री व पुरुष हे परस्परांना पूरक असल्याने स्त्रियांची संख्या कमी झाली तर लग्नाला जोडीदार मिळणे कठीण होईल ..शरीर संबंधांची गरज भागवणे दुरापास्त होईल ...असलेल्या स्त्रियांना रस्त्यावर फिरणे मुश्कील होईल ..बलात्काराचे प्रमाण वाढत जाईल ..आणि मुख्य म्हणजे काही काळानी प्रजनन बंद होईल ..मानवसृष्टी धोक्यात येईल ..तेव्हा निसर्गाच्या विरुद्ध जाणे मानवाने थांबवले पाहिजे !

लैंगिक शिक्षण ???


लैंगिक शिक्षण ???  ( बेवड्याची डायरी - भाग ५८ वा ) 

नेहमीप्रमाणे प्रार्थना घेवून सरांनी आजच्या समूह उपचारांचा विषय म्हणून फळ्यावर ' लैंगिक शिक्षण ' असे लिहीताच ..आम्ही सगळे एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागलो ..इथे सुमारे साठ टक्के लोक लग्न झालेले ..मुलेबाळे असलेले होते ..काही पन्नाशी उलटलेले ..तर उरलेले अविवाहित देखील सज्ञान या व्याख्येत मोडणारे होते ..लैंगिक शिक्षण हा विषय आम्हाला कशाला ? असा विचार माझ्या मनात आलाच ...व्यसनमुक्तीचा आणि लैंगिक शिक्षणाचा काय संबंध ? हा प्रश्न देखील पडला ..सरांनी सगळ्यांच्याकडे पाहून स्मित केले .." तुमच्या सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न असेल ना ..लैंगिक शिक्षणाचा आणि व्यसनमुक्तीचा काय संबंध ? " सर्वांनी होकारार्थी मना डोलावल्या .." मित्रानो लैंगिक शिक्षण केवळ व्यसनमुक्तीशीच नव्हे तर आपल्या संपूर्ण जिवनाशी निगडीत आहे ..लैंगिकतेतूनच आपला सर्वांचा जन्म झालाय ..तरीही आपल्या पैकी फार थोड्या लोकांना लैंगिकते बदल शास्त्रीय माहिती असते .. थोडी फार माहिती आणि भरपूर गैरसमज आपल्या मनात असू शकतात ..लैंगिकता म्हणजे केवळ स्त्री - पुरुष संबंध ..अथवा शारीरिक सुख इतकाच त्रोटक अर्थ लैंगिकतेचा काढला जातो " ..मी पहिल्यांदाच हा विषय कोणीतरी इतक्या उघडपणे चर्चा करतोय हे पहात होतो ..खाजगीत चर्चिला जाणारा हा विषय आहे असेच माझे मत होते ..बहुतेक सगळ्यांच्या मनात हेच चालले असावे कारण बहुतेक लोक सरांकडे न पाहता खाली मान घालून सरांचे बोलणे ऐकत होते ..सर्वांनी आधी माना वर करा ..असे सरांनी सांगितले ..शेरकर काका तुम्ही पण ..सरांनी असे म्हणताच सर्वांनी वर फळ्याकडे पहिले ..शेरकर काका साठीच्या पुढे पोचलेले ..सरांनी त्यांचे नाव घेताच खसखस पिकली ..' आज आपण लैंगिकता म्हणजे नक्की काय ? लैंगिकतेच्या शास्त्रीय बाजू ..या बाबतची स्त्री - पुरुष यांची शारीरिक व मानसिक जडणघडण .. प्रेमसंबंध आणि शरीरसुख ..स्त्री -पुरुष इंद्रीयाबाबतची शास्त्रीय माहिती ..अपत्यप्राप्ती ..लैंगिकतेतून मिळणारे शारीरक आणि मानसिक सुख ..हस्तमैथुन ..दारू आणि इतर मादक पदार्थांच्या सेवनामुळे लैंगिकतेवर होणारे दुष्परिणाम ..तसेच लैंगिकते बाबत असलेले प्रचंड गैरसमज या बाबत चर्चा करणार आहोत ..हा विषय सर्वांच्या जिवनाशी निगडीत असला तरी देखील आपण याची उघडपणे चर्चा करणे टाळतो किवा या विषयाकडे गंभीरतेने न पाहता ..काहीतरी अश्लील....अंधारातले ..चावट ..या दृष्टीकोनातून पाहतो ...या बाबतचे अनेक जोक्स करतो ..खिल्ली उडवतो ..स्त्री पुरुष इंद्रियाशी संबंधित शिव्या देतो ..खाजगीत हमखास चर्चा केला जाणारा हा विषय असूनही याबाबत आपल्याला नेमकी शास्त्रीय माहिती नसते .."

' लैंगिकते बाबत शास्त्रीय माहिती असलेली पुस्तके किती लोकांनी वाचलेली आहेत ? " सरांनी हा प्रश्न विचारताच ..जेमतेम एक दोघांनी बोट वर केले ..बाकी सगळे अवघडल्या सारखे बसलेले होते .." बर आता सांगा ..बाजारात मिळणारी पिवळ्या कव्हरची ..प्रणयाचे रसभरीत आणि अवास्तव वर्णन असणारी..अनैतिक संबंधावर आधारित .मस्तराम ..मुसाफिर .अशा टोपणनावानी लिहिणाऱ्या लेखकांची ..तसेच हैदोस ..बिनधास्त कथा ..मदभरी कहाँनिया ..डेबोनेर ..चॅस्टीटी ..फॅन्टसी .. वगैर नावे असलेली ..उघडीनागडे फोटो असलेली मासिके किती लोकांनी वाचली आहेत ? " सगळे एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले ..घाबरू नका मोकळेपणी हात वर करा ..असे सरांनी म्हणताच सुमारे पन्नास साठ हात वर झाले ..सगळेच हसले ..शेरकर काकांचा देखील हात वर झाला होता ..आता वातावरण जरा मोकळे होत होते ..सरांनी पुढचा प्रश्न विचारला ." किती लोकांनी नेट वर ..वेबसाईटवर ..अथवा आडबाजूला असणाऱ्या थेटरमध्ये ..मित्रांच्या रूमवर .. अश्लील समजले जाणारे चित्रपट ..क्लिप्स ..व्हिडीओ गुपचूप पहिले आहेत ? "..पुन्हा सगळे हात वर झाले ..' अरे वा ..सगळे हात वर झालेत ..म्हणजे या विषयात सर्वाना इंटरेस्ट आहे ..मात्र उघड कबुल करायला शास्त्रीय चर्चा करायला लाज वाटते ..कदाचित म्हणूनच देशात बलात्कार ..स्त्रियांशी संबंधित गुन्हे ..बालकांचे लैंगिक शोषण ..एड्स ..लैंगिकतेशी संबंधित इतर आजार ..गुप्तरोग ..यांचे वाढते प्रमाण आहे ..अधिक लैंगिक सुख मिळवण्यासाठी निरनिराळ्या मादक पदार्थांचा वापर ..उत्तेजना निर्माण होण्यासाठी.. उन्मादासाठी दारूचा वापर असे प्रकार होत आहेत .." 

सर बोलत असताना मागच्या बाजूला बसलेल्या दोघांमध्ये काहीतरी कुजबुज सुरु होती ..हळू हळू त्यांचे आवाज वाढले ..' काय चालले आहे रे तिकडे ? काय गप्पा मारताय .." असे सरांनी विचारताच दोघेही गप्पा बसले ..त्यातील एक म्हणाला .." सर याच्या खिश्यात एका उघड्या नटीचे बिकिनी घातलेले चित्र आहे ..याने मासिकातून फाडून घेतले आहे .." सगळे मोठ्याने हसू लागले ..ज्याच्या खिश्यात ते मासिकातून फाडलेले चित्र होते ..तो खूप खजील झाला ..मानेनेचे नको नको म्हणून लागला .." सर हा ते चित्र घेवून जातो संडासात " अशी एकाने पुस्ती जोडली ..त्या बरोबर पुन्हा सगळे हसू लागले ..सरांनी सर्वाना शांत केले ..' अरे ...यात काही वावगे नाहीय ..असे प्रकार व्यसनमुक्ती केंद्रातच नव्हे तर सगळीकडे घडत असतात ..लैंगिक उत्तेजना मिळवण्यासाठी अशा फोटोंचा वापर होत असतो ..त्यात गुन्हा नाहीय काही " ..तो मुलगा संडासात असा उघडा फोटो घेवून जावून हस्तमैथुन करत असावा हे सगळ्यांचा ध्यानात आले ..तो मुलगा मान खाली घालूनच बसला होता ..सर पुढे म्हणाले ' हस्तमैथुन हे पाप आहे ..हस्तमैथुनाने तेज कमी होते ..इंद्रिय वाकडे होते ..शरीर खंगते ..रक्त कमी होते ..वीर्यनाश होतो ..वगैरे गोष्टी सर्वांनी कोणाकडून तरी ऐकल्या आहेत म्हणून हस्तमैथुन हे मोठे पाप आहे हेच सगळ्यांच्या मनात बसलेले आहे ..खरे तर हस्तमैथुन हे लैंगिक भावनेचा निचरा करण्यासाठी वापरले जाणारे सर्वात सुरक्षित असे माध्यम आहे ..सुमारे ९० टक्के पुरुष या माध्यमाचा कधी ना कधी वापर करत असतात ..फक्त कोणी तसे उघड काबुल करत नाहीत ..तेव्हा त्या मुलाची खिल्ली उडवणे बंद करा " सरांनी असे म्हणताच सगळे अंतर्मुख झाले . 

( बाकी पुढील भागात )

शस्त्र त्याग ???


शस्त्र त्याग ??? ( बेवड्याची डायरी - भाग - ५७ वा )

सुधारणेसाठी आवश्यक असलेल्या सहाव्या पायरीत ..आपल्या स्वभावात असलेल्या दोषांचा त्याग करण्यास सुचवले होते ..हे एक प्रकारे शस्त्रत्याग करण्यासारखेच होते ..राग ..इतरांना दोष देणे ..स्वत:च्या मनासारखे व्हावे म्हणून आरडाओरडा करणे ..खुन्नस ठेवणे . कुटुंबियांना घर सोडून जाण्याची ..आत्महत्येची धमकी देऊन इमोशनल ब्लॅकमेल करणे ..मोठी मोठी स्वप्ने दाखवून त्यांना आपल्या मनासारखे वागायला भाग पाडणे ..किवां गरजेनुसार रडणे ..क्षमायाचना करणे ..पश्चाताप झालाय असे भासवणे ..ही शस्त्रे एक व्यसनी नेहमीच स्वतचे व्यसन करणे सुरळीत सुरु रहावे म्हणून वापरात असतो ..मात्र व्यसनमुक्तीच्या काळात देखील तो सगळे काही आपल्या मनासारखे सुरळीत घडावे म्हणून या शस्त्रांचा वापर करत जातो ..आपल्या स्वभावातील हे दोष वारंवार आपल्याला व्यसनाकडे घेवून जावू शकतात हे त्याच्या गावीही नसते ..केवळ काही दिवस व्यसन बंद असले की तो जग जिंकल्याच्या अविर्भावात वावरू लागतो .. आणि येथेच त्याची फसगत होते ..मग त्याला कोणी आपल्या पूर्वीच्या वागण्याचा उल्लेख केला की राग येतो ..कोणी आपल्या क्षमतेबाबत संशय व्यक्त केला की खुन्नस जागृत होते ..कोणी अविश्वास दर्शवला तर मनापासून वाईट वाटते ...आपण व्यसन आता बंद केलेय या अहंकारात तो जीवनाबद्दल मोठी मोठी स्वप्ने पाहतो ..व्यसन बंद आहे म्हणजे आता सगळे काही मनासारखे सुरळीत घडेल अशी आशा ठेवतो ..आणि तसे घडले नाही तर पुन्हा व्यसनाचा आधार घेतो ! 

सहाव्या पायरीच्या विवेचनात सरांनी हे सारे स्पष्ट केले होते ..माझ्याही बाबतीत नेहमी तसेच घडत आले होते ..खूप आर्थिक त्रास झाला ..किवा काही शारीरिक समस्या आली ..पत्नीने माहेरी जाण्याची धमकी दिली की काही काळ मी व्यसन बंद करत असे .. मनावर घेतल्यावर मी पाहिजे तेव्हा व्यसन सोडू शकतो हा अहंकार जागृत होऊन .. आता सारे काही ताबडतोब सुरळीत व्हावे अशी अपेक्षा मी ठेवत असे सगळ्या जगाकडून ..व्यसन बंद करून मोठे उपकार केल्याच्या भावनेत वावरत असे ..मी व्यसन बंद करू शकतो म्हणजे मी खूप निर्धारी आहे..कुटुंबियांच्या भल्यासाठी मी खूप मोठा त्याग केलाय अशी भावना मनात तयार होऊन ..आता सगळे माझ्या मनासारखे घडावे अशी मागणी करत असे ..मात्र मी व्यसन बंद केले तरी पूर्वी मी व्यसनामुळे दिलेले त्रास ..विश्वासघात ..मुजोऱ्या..माझे आणि कुटुंबियांचे केलेले अतोनात नुकसान इतर सर्वांनी विसरून जावे ही अपेक्षा ठेवत असे ..त्यांना मात्र हे सगळे ताबडतोब विसरणे केवळ अशक्य असते ..मी जणू त्या गावचाच नाही असा वावरत असताना कोणी मी पूर्वी दिलेल्या त्रासाची आठवण काढली की मला राग येई ..जुन्या गोष्टींचा उल्लेख करून हे लोक उगाच मला त्रास देत आहेत असे वाटे ..माझ्या भावनांची कोणालाही पर्वा नाही असे वाटे ..कोणी माझ्या मनाविरुद्ध वर्तन केले की मला अपमान वाटे ..माझ्यावर अविश्वास व्यक्त केला की खुन्नस वाटे घरच्या लोकांची ..आणि मग माझी चिडचिड सुरु होई ..तसेच सगळे आपल्या मनासारखे सुरळीत कधी होईल या विचाराने मी अवस्थ राही ..अशी बैचेनीची ..रागाची ..अपमानाची भावना मला सतत अस्वस्थ ठेवत असे ..आणि एक दिवस माझी सहन शक्ती संपुष्टात येवून ' व्यसन बंद ठेवून काही फायदा नाही ' असे विचार मनात सुरु होता असत ..अरेरे मी किती गरीब बिच्चारा..सगळे जग किती स्वार्थी .. माझ्या त्यागाची कोणाला किंमत नाही ..वगैरे विचारांनी मी ' फक्त आज एकदाचा खूप मनस्ताप होतोय म्हणून थोडेसे व्यसन करायला काय हरकत आहे ' या विचारांनी एकदा म्हणून प्यायला जात असे ..या आजाराचा सगळ्यात घातक भाग असा की एकदा म्हणून घेतले की माझ्या शरीर मनाची व्यसनाबद्दल असलेली सुप्त भूक जागृत होऊन पुन्हा पुन्हा मी व्यसन करत राही ..परत जीवनाबद्दलचे सगळे नकारात्मक विचार मला घेरून रहात आणि पूर्वीचेच वर्तन सुरु होई .

सरांनी दिलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहून मी समाधानाने डायरी बंद केली ..माझ्या बाजूला बसलेल्या शेरकर काकांनी मला टोमणा मारलाच ..' काय स्कॉलर ? " असे म्हणत डोळे मिचकावले ..मी देखील हसून त्यांना टाळी दिली ..स्वताचे परखड आत्मपरीक्षण करताना खूप हलके वाटते हे मी काकांना समजावून सांगू शकत नव्हतो ..तितक्यात एक गांजाचा व्यसनी आमच्या जवळ आला ..हा गडी तसा खुशालचेंडू होता ..तो सगळ्या थेरपीज निव्वळ नाईलाजाने करत असे ..प्रत्येक वेळी माॅनीटर त्याला रागवत असे ..तरीही याच्यावर काही परिणाम होत नसे ..त्याला पाहून काकांनी हाताने चिलीम ओढण्याची अॅक्शन करत ' भोले ..भेज दे सोने चांदी के गोले ' असा पुकारा केला ..तो मनापासून हसला . बसलाच आमच्या जवळ येवून..केवळ गांजा पिण्याची अॅक्शन पाहूनच तो एकदम उत्तेजित झाल्यासारखा वाटला ..त्याचे डोळे चमकू लागले ..बापरे किती खोल आकर्षण दडले असते मनात हे मला जाणवले ..माझ्याही बाबतीत असेच होता असावे असे वाटले ..माझ्या व्यसनमुक्तीच्या काळात कोणी दारुडा मित्र भेटला ..अथवा दारूने मिळणाऱ्या आनंदाचा कोणी उल्लेख केला तर मी असाच उत्तेजित होऊन ' एकदा तरी घ्याला हवी ' हा किडा मनात रेंगाळू लागे ..कधीतरी कुठल्या तरी निमित्ताने मग हा डोक्यातला किडा शेवटी मला व्यसनाकडे घेवून जाई . 

( बाकी पुढील भागात )

Friday, August 15, 2014

तुलना !

तुलना ! ( बेवड्याची डायरी - भाग ५६ वा ) 

डायरीत सरांनी सांगितलेल्या प्रश्नाचे उत्तर मी अतिशय गंभीरपणे लिहित असताना ..अमित नावाचा एक तरुण माझ्याजवळ आला ..हा ४ दिवसांपूर्वीच उपचारांसाठी दाखल झाला होता ..डायरीत नेमके काय लिहायचे हे त्याला समजत नव्हते ..तो माझ्या डायरीत वाकून पाहू लागला ...माझे उत्तर पाहून तुला कसे उत्तर लिहिता येईल ? मी त्याला विचारल्यावर तो हसून म्हणाला ..अहो तुम्ही जरा व्यवस्थित लिहिता असे मला समजलेय..तुमचे पाहून मी लिहिले तर माझे उत्तर सरांना आवडेल आणि मला लवकर डिस्चार्ज मिळेल येथून ..त्याची हि समजूत वेडगळपणाची होती . केवळ चांगली डायरी लिहितोय हा काही लवकर डिस्चार्ज मिळण्यासाठीचा निकष नव्हताच ..जे लिहले जातेय ते किती प्रामाणिक पणे लिहिलेय हे त्या व्यक्तीच्या इतरवेळीच्या वर्तना वरून निरीक्षण करून समजतेच .व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या वर्तनावर बारीक लक्ष ठेवायला येथील निवासी कार्यकर्ते तत्पर असत आणि त्याच्या अनुभवातून त्यांना कोण किती प्रामाणिकपणे उपचार घेतोय हे समजत असे .आधी माझे लिहून होऊ दे ..मग तुला सांगतो कसे उत्तर लिहायचे ते असे मी त्याला सांगितले .

वार्डातील बहुतेक जण डायरी लिहिण्यात मग्न होते ..माॅनीटर नेहमीप्रमाणे सर्व डायरी लिहित आहेत ना यावर लक्ष ठेवून होता ..काही पुन्हा पुन्हा उपचारास येणारे लोक हे डायरी वैगरे लिहून काही फायदा नाहीय या अविर्भावात बसले होते ..त्यापैकी एकाला माॅनीटर ने हटकले ..' काय रे कितवी अॅडमिशन ? " या प्रश्नावर तो जरा वरमला ..खाली मान घालून हाताची बोटे मोजत म्हणाला ' सातवी ' ..त्याचे उत्तरे ऐकून आसपासचे हसू लागले ..तो आणखीनच खजील झाला .मग त्वेषाने म्हणाला ' मेरे बाप के पास जादा पैसे हो गये है ..इसलिये बार बार मुझे यहाॅ रखा जाता है ... देखते है कितने बार रखेगा " त्याचे हे उर्मट पणाचे बोलणे सर्वांनाच खटकले ..माॅनीटर त्याला म्हणाला '" अरे प्रत्येक वेळी तू बाहेर पडल्यावर दारू प्यायला म्हणून तुला वडिलांनी येथे परत आणलेय उपचारांना ..मी दारू पिणारच अथवा मला माझ्या मर्जीने जगता आले पाहिजे हा अट्टाहास तू सोडत नाहीस तोवर तुझे वडील तुला येथे दाखल करतील..इतक्या वर्षात तुला साधी इतकी गोष्ट समजली नाहीय की आईवडील जो निर्णय घेतात तो नेहमी आपल्या भल्याचा असतो ..तुला वाटते त्यांच्या कडे जास्त पैसे आहेत म्हणून दाखल करत आहेत उपचारांना ..किती मोठा मूर्ख आहेस तू ..दारूमुळे तुझे जिवन उध्वस्त होऊ नये म्हणून हे सगळे सुरु आहे हे समजले की तू सुधारशील ..तुला आईबापानी किती स्वप्ने पाहत मोठे केलेय ..त्यांनी तुला मोठे करण्यासाठी खूप कष्ट उपसलेत ..हे तुला समजत नाही यात तुझाच दोष आहे ..तू जोवर तुझा हट्टीपण सोडणार नाहीस तोवर हे असेच चालत राहील ..तू जर इतका शहाणा .. स्वाभिमानी आहेस ..स्वतच्या मर्जीने तुला जगायचेय तर मग सरळ घर सोडून निघून जा कुठे तरी ..स्वताच्या पायावर उभा राहा ..वाट्टेल तशी व्यसने कर ..तुला कोणी अडवणार नाही ..मात्र आईवडिलांच्या पैशावर ..त्यांच्याच घरात राहून ..तू व्यसने करशील तर त्यांचे कर्तव्याच आहे तुला योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करणे ' तो मुलगा माॅनीटरचे उत्तर ऐकून उसळून म्हणाला " मेरा बाप भी तो हप्ते मे एक बार पिता है एक दो पेग दारू " तो आता वाद घालण्याच्या मूड मध्ये होता ..' छान ! तुझे वडील आठवड्यातून एक वेळा दारू पितात हे बरोबर लक्षात ठेवलेस ..मात्र वडिलांनी त्यांचे करिअर कसे घडवले ..किती कष्ट केले ..तुम्हाला तुम्हाला कसे मोठे केले हे लक्षात नाहीय तुझ्या ..तू आधी व्यसनमुक्त राहून स्वतःचे करियर घडव ..आणि मग वडिलांशी तुलना कर ..इतकेच काय वडिलांचे पिणे वाढले तर त्यानाही उपचारांना घेवून ये हवे तर तू ..पण त्या आधी स्वतः व्यसनमुक्त होणे महत्वाचे " माॅनीटर ने समज दिल्यावर तो डायरी लिहू लागला ..

त्यांचा संवाद ऐकून वाटले आपणही लोक पितात म्हणून मी प्यायलो तर काय हरकत आहे या विचारानेच दारू पीत गेलो होतो ..जगात बहुसंख्य लोक व्यसने करीत नाहीत हे मात्र आपण समजून घेतले नाही ..म्हणजेच नकारात्मक गोष्टी मी लवकर शिकलो होतो ..मनोरंजन म्हणून खेळ ..कला ..निसर्गात फिरायला जाणे ..आपला फावला वेळ सकारात्मक कार्यात घालवणे वगैरे मी करू शकलो असतो तरी देखील मी मनोरंजन म्हणून दारू पिण्याचा मार्ग पत्करला ही माझीच चूक होती ..शिवाय माझी चूक मान्य न करता मला दारू पिण्यास कोणीही आडकाठी करू नये ..माझ्या दारू बद्दल कोणी बोलू नये ..मला माझ्या मर्जीने जगू द्यावे हा हट्ट कायम ठेवला होता ..माझ्या पिण्यामुळे पत्नी ..मुले ..इतर नातलग किती दुखी: होता आहेत याचा विचारही माझ्या मनाला शिवला नव्हता .हा माझा एक प्रकारचा अहंकारच होता .

( बाकी पुढील भागात )

Friday, August 8, 2014

स्वता:शी लढाई !

स्वता:शी लढाई ! ( बेवड्याची डायरी - भाग ५५ वा )

" व्यसनांमुळे निर्माण झालेले अथवा आधीपासूनच आपल्या स्वभावात असलेले .. स्वभावदोष काढून टाकण्याची प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी असते ..तसेच ती एकट्याच्या बळावर कधीच पूर्ण होत नाही ..कारण आपले स्वभाव दोष हे आपल्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग बनलेले असतात ..तसेच अनेकदा हे स्वभावदोष आपण ..स्वतःच्या समर्थनासाठी ..स्वतःच्या बचावासाठी ..इतरांना घाबरविण्यासाठी ...आपल्या मनासारखे होण्यासाठी ..एक शस्त्र म्हणून वापरले आहेत ..आता हे स्वभाव दोष कर्णाच्या कवचकुंडलांसारखे आपल्या व्यक्तिमत्वाला चिकटून बसलेले आहेत ..या स्वभावदोषांमुळे आपण अनेकदा संकटात सापडलो आहोत तरीही आपण आपल्या स्वभावात काही दोष आहेत आणि ते काढून टाकले तरच कायमची व्यसनमुक्ती ..तसेच एक प्रसन्न आणि उपयुक्त असे व्यक्तिमत्व आपल्याला लाभेल हे मान्य करणे कठीण जाते आपल्याला ..अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमस च्या बारा पायऱ्या केवळ व्यसनमुक्तीच नाही तर एकंदरीतच जीवनाचा दर्जा सुधारून आदर्श आणि अध्यात्मिक उंची गाठण्यासाठी मदत करतात म्हणून केवळ व्यसनमुक्त न राहता पुन्हा पुन्हा व्यसनात अडकू नये आणि आपले व्यक्तिमत्व स्वतःसाठी आणि इतरांसाठी उपयुक्त बनविण्याच्या उद्देशाने आपण सहाव्या पायरीत सांगितल्याप्रमाणे आपले स्वभावदोष काढून टाकण्याच्या प्रयत्नाला लागले पाहिजे .."

सर सहाव्या पायरीचे विवेचन विवेचन देताना पुढे म्हणाले " आपल्या व्यक्तिमत्वातील सारे स्वभाव दोष परमेश्वराच्या मदतीने काढून टाकण्यास सुचवले आहे ..म्हणजेच आपल्या जवळचे नातलग ..आपले शुभचिंतक ..आपल्याला वेळोवेळी योग्य वागणुकीसाठी प्रेरित करणारे आपले गुरुजन ..समुपदेशक .अथवा अल्कोलीक्स अॅनाॅनिमस मधील आपला स्पाॅन्सर ..तसेच वेळोवेळी आपल्यावर ओढवणारी परिस्थिती ..एखादी त्रासदायक घटना ..एखादी आपत्ती ..आपल्यावर टीका करणारे लोक ...हे सारेच परमेश्वर या व्याख्येत समाविष्ट आहे हे विसरता कामा नये ..आपले स्वभाव दोष काढून टाकण्यासाठी आपल्याला आवडेल अशी अनुकूल पद्धतच वापरली गेली पाहिजे हा अट्टाहास नको ..जसे शिल्पकार एखादे शिल्प कोरताना मोठी शिळा घेवून त्यावर छिन्नी ..हातोडी ..वगैरे हत्यारांचा वापर करून त्यातून एखादे सुंदर शिल्प साकार करतो तशीच ही प्रक्रिया असणार आहे ..सगळे मला अनुकूल असले तरच मी स्वतःमध्ये योग्य ते बदल करीन असे न म्हणता जमेल त्या प्रकारे ..आहे त्या परिस्थितीत ..त्रासदायक प्रसंगी ..अपमानजनक घटनेतूनही परमेश्वर मला काही शिकवण देवून माझे स्वभाव दोष काढून टाकण्यास मला मदत करू शकतो हा दृष्टीकोन असला पाहिजे ..प्रत्येक वेळी आपल्याशी गोड बोलून लोक आपल्याला बदलला प्रेरित करतील असे नव्हे तर काही वेळा रागावून ..टीका करून ..निर्भत्सना करून ..देखील लोक आपल्याला काही शिकवण देवू शकतात .. म्हणूनच तर संतानी म्हंटले आहे ' निंदकाचे घर असावे शेजारी '

आपल्याशी केवळ चांगले वर्तन करणारे लोक अथवा आपल्याला अनुकूल असलेली परिस्थितीच बदलास सहाय्य करेल असे नाही तर आपल्याशी दुरावा बाळगणारे ..सतत टीका करणारे ..आपल्या मनाविरुद्ध वागणारे लोक ..प्रतिकूल परिस्थिती देखील ..आपल्याला काही शिकवण देवू शकतात यावर विश्वास ठेवता आला पाहिजे ..त्यामुळे विपरीत प्रसंगात आपला विवेक सोडता कामा नये ..अर्थात हे सगळे ताबडतोब जमेल असे नाही ..मात्र बदलाचा ध्यास असला कि नक्की जमते " असे सांगत सरांनी फळ्यावर प्रश्न लिहिला.. " आपले स्वभावदोष दूर करण्यासाठी कोणी कोणी आजवर आपल्याला मदत केली आहे आणि कशा प्रकारे ? "...समूह उपचाराची संपला तसा मी लगेच डायरीत प्रश्नाचे उत्तर लिहायला बसलो ..डोळ्यासमोर अनेक प्रसंग होते जेथे मला वडिलांनी कठोर शब्दांचा वापर करून माझ्या वागण्यात बदल सुचवला होता ..ऑफिस मध्ये बाॅसने रागावून ..वाॅर्निग देवून मला फटकारले होते ..माझ्या लक्षात आले कि त्यावेळी मी अपमान न वाटून घेता हे लोक आपल्याला बदलासाठी मदत करत आहेत असे समजलो असतो तर नक्कीच मला फायदा झाला असता ..मात्र माझ्या अहंकारा मुळे मी त्यांनी माझा अपमान केला असे समजून बदल करण्याएवजी सूडभावना मनात ठेवली ..अथवा स्वतःला त्रास करून घेत दुप्पट व्यसने केली होती ..

( बाकी पुढील भागात )

स्वभावदोष हाकलणे !

स्वभावदोष हाकलणे ! ( बेवड्याची डायरी - भाग ५४ वा )

काल समूह उपचार संपल्यावर आम्ही सगळे डिस्चार्ज होणाऱ्या व्यक्तीला स्वत:च्या पत्नीचा फोन नंबर देणाऱ्या पाटील भोवती गोळा झालो होतो ..सगळे त्याला तू मूर्ख आहेस असे म्हणत होते ..तो खजील होऊन बसला होता ..शेरकर काका अशी मस्करी करण्याची संधी सोडत नाहीत ...ते पाटील ला म्हणाले ..तुला पुढची बातमी तर सरांनी सांगितलीच नाहीय ..मला ऑफिस मधून असे समजलेय की तो दारू पिवून तुझ्या घरी पण गेला होता ..आणि तुझ्या पत्नीकडे उधार पैसे मागत होता ..तुझ्या पत्नीने त्याला पैसे न देता घरातून हाकलले ..नंतर तिला खूप राग आला तुझा आणि तिने सरांना फोन करून तुला किमान सहा महिने तरी इथे ठेवावे अशी विनंती केली आहे ..हे ऐकून पाटील चक्क रडू लागला ..आता अजून सहा महिने वाढले उपचारांचे हा मोठाच धक्का होता ..मग तो शेरकर काकांच्या मागे लागला ..तुम्ही खरे सांगा ..अजून काय म्हणाली माही पत्नी सरांना ? कधी फोन केला होता तिने ? वगैरे प्रश्न विचारू लागला ..त्याची केविलवाणी अवस्था पाहून सर्वांनी त्याची खूप मजा केली ..मग एकेक जण असे डिस्चार्ज होणार्या व्यक्तीला घरचा फोन नंबर व पत्ता दिल्याने पूर्वी घडलेले ऐकीव किस्से सांगू लागले .. एकाने असा घरचा पत्ता घेवून उपचार घेणाऱ्या व्यक्तीच्या घरी जावून खोटीनाटी करणे सांगून पैसे घेतले होते ..एकाच्या सांगण्यावर विश्वास ठेवून उपचार घेणाऱ्या व्यक्तीला खरोखर डिस्चार्ज केले होते ..नंतर ते दोघेही नियमित एकमेकांना भेटू लागले ..दोघांचेही दारू पिणे सुरु झाले त्यामुळे ..हे किस्से ऐकून मी मनाशी ठरवले की इथे उपचार घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कितीही चांगला मित्र असला तरी आपल्या घरचा पत्ता व फोन नंबर द्यायचा नाही ..इथे राहताना मित्र निवडताना देखील काळजी घेणे गरजेचे आहे ..जे लोक अजूनही नकारात्मक विचार करतात ...गंभीरतेने उपचार घेत नाहीत ..थेरेपीज बुडवतात अशा नाठाळ लोकांपासून चार हात दूर राहिलेले बरे ..

आजच्या समूह उपचारात सरांनी फळ्यावर अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमसची सहावी पायरी लिहिली.. ज्यात म्हंटले होते की '"परमेश्वराच्या मदतीने आम्ही आमचे सगळे स्वभावदोष काढून टाकण्यास पूर्णपणे तयार झालो " फळ्यावर पायरी लिहून होताच सरांनी मोठा सुस्कारा सोडला ..म्हणाले खूप कठीण काम आहे हे ..व्यसनी व्यक्तीला केवळ व्यसनमुक्तीच नव्हे तर एक आदर्श जीवन जगण्यास प्रेरणा आणि मार्गदर्शन देणाऱ्या या बारा पायऱ्या कोणी पूर्ण प्रामाणिकपणे आचरणात आणल्या तर तो नक्कीच ' संत ' बनेल ..अर्थात आपल्याला जरी संत बनायचे नसले तरी एक सर्वसामान्य आयुष्य समाधानाने आणि प्रसन्नतेने व्यतीत करायचे आहे ..त्यामुळे जास्तीत जास्त प्रामाणिकपणे या सूचनांचे पालन करण्याचा प्रयत्न करायला हवा ..असे म्हणतात की एक व्यसनी व्यक्तीकडे जन्मतः नैसर्गिक इच्छा आणि आकांक्षा इतर व्यक्तीपेक्षा जास्त प्रमाणात असतात .. तो स्वताच्या इच्छापूर्ती साठी अधिक आग्रही असतो ..कदाचित त्यामुळेच तो जास्त जिद्दी ..हट्टी बनलेला असतो ..त्याला प्राप्त झालेल्या अतिरिक्त बुदिमत्तेचा वापर करून तो नेहमी स्वता:च्या इच्छेनुसार जगण्याचा प्रयत्न करतो ...शिवाय संवेदनशील व हळवा असल्याने छोट्या छोट्या गोष्टीत तो पटकन रागावतो ..निराश होतो ..दुखी: होतो ..वैफल्यग्रस्त होतो या सर्व नकारात्मक भावनांचा परिणाम म्हणून तो सहजगत्या व्यसनांकडे आकर्षित होतो ..स्वताच्या इच्छेने जीवन व्यतीत करता यावे या अट्टाहासामुळे तो सहजगत्या खोटे बोलतो ..ढोंगीपणा करतो ..दुहेरी व्यक्तिमत्व बनते त्याचे ..त्यातूनच अनेक प्रकारचे स्वभावदोष निर्माण होतात त्याच्या स्वभावात ..पुढे व्यसनाच्या काळात तो पूर्णतः निर्ढावतो ..अनेक स्वभावदोष त्याच्या वागण्यात इतरांना जाणवतात ..आता जरी आपण इथे उपचार घेताना व्यसनमुक्त असलो तरी जोवर या स्वभावदोषांची आपण दखल घेत नाही आणि ते काढून टाकण्याचा प्रयत्न करत नाही तोवर आपले व्यसन वारंवार सुरु होण्याचा धोका कायम आहे ..वैचारिक आणि भावनिक संतुलन साध्य करणे आपल्याला आवश्यक ठरते ..सांगा बरे आपल्यात कोणते कोणते स्वभाव दोष आहेत असे आपल्याला वाटते ? सरांच्या या प्रश्नावर एकेकाने उत्तर देण्यास सुरवात केली ..खोटे बोलणे ..बाता मारणे ..दिवास्वप्ने पाहणे ..अतिआत्मविश्वास ..स्वतःला शहाणा समजणे ...दोषारोप करणे ..इतरांच्या भावनांची पर्वा नसणे ..आत्मकेंद्रित वृत्ती ..कृतघ्नता ..आळशीपणा ..कामचुकारपणा ..बेजवाबदारपणा ..असमंजसपणा ..उतावळेपणा .आर्थिक गैरव्यवहार करणे ..पैश्यांची अफरातफर करण्याची वृत्ती ...चैनीवृत्ती ..अय्याशी वृत्ती ..चालढकल करण्याची वृत्ती ..कमी कष्टात जास्त पैसे मिळावेत अशी इच्छा असणे ..झटपट सुख मिळावे अशी लालसा ..इतरांवर दादागिरी करणे ..माझेच म्हणणे खरे असे वाटणे . ..सतत असुरक्षित वाटणे ..वार्डातील सगळे पटापट ऐकेक स्वभावदोष सांगत होते ..सर ते फळ्यावर लिहित होते ..पाहता पाहता मोठीच यादी तयार झाली ..

त्या यादीकडे पाहत हसून सर म्हणाले " बापरे ! .तुम्ही सर्व खूपच प्रामाणिकपणे सांगितले आहेत आपले स्वभावदोष .आता हाच प्रामाणिकपणा हे स्वभावदोष निघून जाण्यासाठी वापरला पाहिजे ..यापैकी काही ना काही दोष प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीत देखील असतात ..मात्र त्यांचे हे दोष त्यांना व्यसनाकडे नेण्यास प्रवृत्त करत नाहीत कारण त्यांना व्यसन करू नये हे भान असते ..व्यसनामुळे आपले शारीरिक.. आर्थिक ..मानसिक.. कौटुंबिक ..सामाजिक पातळीवर नुकसान होऊ शकते याची त्यांना पूर्ण कल्पना असते ..किवा व्यसन करणे योग्य नाही हा संस्कार त्यांच्या मनावर लहानपणापासून पक्क कोरला गेला असतो ..त्यामुळे त्यांचे स्वभावदोष जरी इतरांसाठी घातक..त्रासदायक असले तरी त्यामुळे ते व्यसन करतील असा धोका नसतो ..आपल्या बाबतीत मात्र ' आधीच मर्कट ..त्यात मद्य प्यायला ' असे घडलेय ..त्यामुळे आता हे मर्कटपण काढून टाकले तरच आपली व्यसनमुक्ती सहजपणे टिकते ..तसेच समाधानी आणि स्वतःसाठी तसेच इतरांसाठी उपयुक्त असे आयुष्य घडवण्यास आपल्याला मदत मिळते ..पुढे सर म्हणाले या पायरीत म्हंटले आहे की परमेश्वराच्या मदतीने हे स्वभावदोष काढून टाकायचे आहेत ..म्हणजे आपल्याला स्वताच्या बळावर हे करता येणे कठीण आहे ..कारण सध्या आपले स्वभाव दोष हे आपले शस्त्रे किवा अस्त्रे बनली आहेत..आनंदाने जीवन व्यतीत करता यावे यासाठी आपण या शस्त्रांचा वापर ..गैरवापर करत आलो आहोत ..अशी शस्त्रे स्वतःहून त्यागण्यास आपले अंतर्मन सहजासहजी तयार होणार नाही...व्यसनमुक्तीचा आणि स्वभावदोष काढून टाकण्याचा काहीही संबंध नाही असे आपल्याला वाटेल ..जगत माझ्यापेक्षा जास्त स्वभावदोष असलेली अनेक माणसे आहेत ..त्यात काय विशेष ? ..प्रत्येक व्यक्तीत असतातच स्वभावदोष अशी समर्थने मनात तयार होऊ शकतात ..या समर्थानांच्या आड लपून आपण स्वभावदोष काढून टाकण्याच्या बाबतीत चालढकल करू शकतो ...हे स्वभावदोष काढून टाकताना खूप मानसिक त्रास होईल आपल्याला ..तरी आपली ही शस्त्रे त्यागणे गरजेचे आहे हे लक्षात घेतले पाहिजे ..

( बाकी पुढील भागात )

आदरणीय व्यक्ती !

आदरणीय व्यक्ती ! ( बेवड्याची डायरी - भाग ५३ वा )

कन्फेशन करताना अथवा आपल्या चुकांचा कबुली जवाब देताना पाचव्या पायरीत जो आदरणीय व्यक्तीचा उल्लेख आहे त्या बाबतीत सांगताना सरांनी आजच्या समूह उपचारात... अशी आदरणीय व्यक्ती कोण असावी असे आपल्याला वाटते ? हा प्रश्न सर्वाना विचारला ..एकाने सांगितले की त्याचे आजोबा त्याच्या दृष्टीने आदरणीय आहेत ..एकाने त्याच्या एका यशस्वी मित्राचे नाव सांगितले ..मी माझ्या एका नातलगाचे नाव सांगितले जो अध्यात्मिक विचारांचा होता ..सर्वांची उत्तरे ऐकून समाधानाने स्मित करत सर बोलू लागले ..मित्रानो , आपण योग्य विचार करत आहात ..पाचव्या पायरीत ईश्वराजवळ म्हणजे ईश्वरासामान असलेल्या आपल्या नातलगांपाशी ..स्वताच्या अंतर्मनाशी तसेच अन्य आदरणीय व्यक्तीजवळ आपल्या गतजीवनातील चुकांची तंतोतंत कबुली देण्यास सांगितले आहे ..या कबुलीजबाबात एक अडचण अशी येते की आपण गतजीवनात केलेल्या अनेक चुकांची स्पष्ट कबुली आपल्या जवळच्या नातलगांपाशी देणे कठीण असते ..अनेकदा आपण नशेत ..अथवा नशेसाठी पैसे मिळवण्यासाठी ..किवा नशेत असताना एखाद्या विकाराच्या आहारी जावून खूप खालच्या पातळीचे अनैतिक वर्तन केले असल्याची शक्यता असते ..जे वर्तन जवळच्या नातेवाईकांना कधीच समजू नये अशी आपली इच्छा असते ..कारण त्यातून त्यांना धक्का बसण्याची शक्यता असते ..किवा त्या गोष्टी सांगितल्याने नातलगांशी असलेले आपले जिव्हाळ्याचे संबंध बिघडण्याची शक्यता असते ..उदा . जर नशेच्या भरात मित्रांच्या आग्रहाने एखाद्याने विवाहित असूनही वेश्यागमन केले असेल ..विवाहबाह्य संबंध ठेवले असतील ..तर ते त्याला जवळच्या नातेवाईकांजवळ कबुल करणे कठीण असते ..त्यामुळे त्याच्या नातेसंबंधात बिघाड होण्याची शक्यता वाढते ..किवा पत्नी ..आईवडील ..भावंडे यांच्या दृष्टीने एखादा अक्षम्य गुन्हा केला असेल तर त्याबाबत कबुली त्यांच्याजवळच देणे शक्य नसते ..अशा वेळी मनमोकळे करण्यासाठी म्हणून आदरणीय व्यक्तीचा उल्लेख केलेला आहे ..ही आदरणीय व्यक्ती बहुधा जवळच्या नात्यामधील नसते ..अथवा जी आपल्या कबुलीजवाबाने विचलित होईल अशी नसावी ..तसेच आपण केलेल्या कबुलीचा गैरफायदा घेईल अशीही नसावी ही दक्षता घ्यावी लागते ..किवा ती व्यक्ती अशा गोष्टी खाजगी ठेवेल याची आपल्याला खात्री असायला हवी,,तसेच आपल्याला आपण केलेल्या चुकीबद्दल दोष न देता ...समजून घेवून पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी मार्गदर्शन करणारी असली पाहिजे ..कबुलीजवाबासाठी अशी आदरणीय व्यक्ती निवडणे हे हुशारीचे काम आहे ..उगाच भावनेच्या भरात कोणाजवळही अशी कबुली देणे नक्कीच हितावह नसते ..

सरांनी या बाबत स्पष्ट केले की बहुधा अशी आदरणीय व्यक्ती म्हणून आपण अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमसच्या जेष्ठ सदस्याची निवड करू शकतो .. ज्याला अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमस मध्ये ' स्पाँन्सर ' म्हंटले जाते ..किवा ही व्यक्ती एखादा व्यावसायिक समुपदेशक ..किवा व्यसनमुक्ती केंद्रातील जवाबदार समुपदेशक असली पाहिजे ..अन्यथा आपल्या कबुलीजवाबाने आपली अपराधीपणाची बोच कमी होऊन पुढील योग्य मार्गदर्शन मिळण्याऐवजी एखाद्या नवीन संकटाला सामोरे जावे लागेल ..ही आदरणीय व्यक्ती जर व्यसनमुक्तीच्या बाबत आपल्यालों मदत करणारी असली तर अधिक उत्तम असते ..अशी व्यक्ती निवडताना आपण नीट काळजी घेतली पाहिजे ..आपला कबुलीजवाब आपल्या पुढील मार्गात अडथळा होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे ..असे सांगत सरांनी पाचव्या पायरीवरील चर्चा संपली असे जाहीर केले ..व्यसनी व्यक्तीचा स्वभाव बहुधा अनैतिकतेकडे झुकणारा असतो त्यामुळे त्याने व्यसनाच्या काळात कौटुंबिक दृष्ट्या , सामाजिक दृष्ट्या , कायद्याच्या दृष्टीने... काही गुन्हे केले असण्याची शक्यता असते ..अशा वेळी कबुलीजवाब जपून द्यावा हे सरांचे म्हणणे आम्हाला तंतोतंत पटले ..नंतर सरांनी आमच्यातील पाटील नावाच्या एकाला उभे केले व त्याला विचारले ' तू परवा रविवारी डिस्चार्ज झालेल्या कोणाजवळ आपल्या घराचा पत्ता व पत्नीचा फोन नंबर दिला होतास ते सांग ? सरांच्या या प्रश्नावर पाटील हडबडला ..त्याचा चेहरा गोंधळल्या सारखा झाला ..' नाही सर ..मी कोणालाच पत्ता व नंबर दिलेला नाही ..शपथ " असे म्हणू लागला ..हे नवीन काय ते आम्हाला समजेना ..सरांनी पुन्हा पाटीलला जरा दरडावून विचारले .' खरे सांग तू ..आम्हाला सगळे समजले आहे ..' यावर पाटीलने मान खाली घातली ...आम्हाला समजले की पाटील खोटे बोलतोय म्हणून ..

सर पुढे सांगू लागले ' व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर लवकरात लवकर पडावे हे सर्वांनाच वाटणे स्वाभाविक आहे ..परंतु त्यासाठी आपण चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नये ..इथे वेगवेगळ्या स्वभावाचे ..वेगवेगळ्या संस्कृतीचे ..वेगवेगळी नशा करणारे लोक उपचार घेत आहेत ..या पैकी कोण मनापासून उपचार घेतोय हे समजणे कठीण आहे ..कारण व्यसनी व्यक्ती हा दुहेरी व्यक्तिमत्वाचा किवा ढोंगी प्रवृत्तीचा असतो ..तेव्हा येथे मैत्री करताना आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे ..इथून बाहेर पडल्यावर येथे मैत्री झालेल्या मित्रांना बाहेर भेटणे धोकादायक असू शकते ..कारण जर त्या मित्राने पिणे सुरु केले तर आपणही त्याच्या सोबत ' रीलॅप्स ' होऊ शकतो ..काही लोक डिस्चार्ज होणाऱ्या व्यक्ती जवळ आपल्या घरचा पत्ता किवा फोन नंबर देतात आणि सांगतात की माझ्या घरी जावून घरच्यांना सांग की मी खूप आजारी आहे ..इथे मला खूप त्रास होतोय ..मला उपाशी ठेवतात ..मारतात ..बांधून ठेवतात ..वगैरे ..म्हणजे घरचे लोक घाबरून लवकर मला डिस्चार्ज देतील ..मित्रानो हा मार्ग अत्यंत चुकीचा आणि खोटेपणाचा आहे ..आपण बाहेर व्यसने करून ..खोटे वागून कुटुंबियांना भरपूर त्रास दिलेला आहे ..आता येथे असताना पण आपण असे खोटे निरोप बाहेर पाठवून घरच्या मंडळीना त्रासात टाकणे योग्य नाही ..या पाटीलने परवा डिस्चार्ज होणाऱ्या एकाजवळ आपल्या पत्नीचा फोन नंबर दिला होता ..तिला लवकर घेवून जा असा निरोप देण्यासाठी ...त्या माणसाने डिस्चार्ज होऊन बाहेर पडल्यावर सरळ याच्या पत्नीला फोन करून ..हा इथे खूप वाईट अवस्थेत आहे असा स्वताचे नाव न सांगता खोटा निरोप दिला ..याची पत्नी घाबरली ..तिने आम्हाला फोन करून खरी माहिती विचारली ..आम्ही सर्व काही ठीक आहे ..या असल्या फोनवर विश्वास ठेवू नका असा तिला धीर दिला ..मात्र नंतर ज्याला नंबर दिला होता तो आता रात्री बेरात्री वारंवार फोन करून याच्या पत्नीला याला लवकर घरी घेवून या असा आग्रह करतोय ..एकदा तर त्याने म्हणे दारू पिवून याच्या पत्नीला फोन केला ..आता हे कितपत योग्य आहे हे तुम्हीच सांगा ..हे ऐकून आम्हाला सगळ्यांना त्या फोन करणाऱ्या व्यक्तीचा रागच आला ..तसेच त्याच्याजवळ पत्नीचा फोन नंबर देवून तिला फोन करायला लावणाऱ्या पाटीलचा देखील राग आला ..शेवटी ती व्यक्ती पत्नीला त्रास देतेय हे ऐकून पाटीलने सरांना त्याचे नाव सांगितले .

( बाकी पुढील भागात )

Saturday, June 7, 2014

हर एक रूह प्यासी !


हर एक रूह प्यासी ! ( बेवड्याची डायरी - भाग ५२ वा ) 


मैत्री मध्ये उपचारांना दाखल होईपर्यंत व्यसनाधीनतेचे इतके भयंकर प्रमाण आहे अथवा हा आजार इतका गंभीर आहे याची मला कल्पनाच नव्हती ..इथे दाखल झाल्यानंतर जेव्हा वार्डात फावल्या वेळात मी उपचार घेणाऱ्या इतर मित्रांशी जेव्हा त्याच्या समस्यांबद्दल चर्चा करत असे ..त्यांच्या दारू पिण्याचे ..वारंवार उपचार घेण्याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला .तेव्हा जाणवले की उपचार घेणाऱ्या बहुतेकांची काही तरी व्यथा आहे ..ही व्यथा इतरांच्या दृष्टीने नसली तरी त्यांच्या दृष्टीने मात्र खूप गंभीर आहे ..आयुष्यात काहीतरी न मिळू शकल्याची टोचणी ..कधीतरी झालेल्या उपेक्षेचा बोचणारा काटा ...जे मिळाले आहे त्यात काहीतरी कमी असल्याची भावना ..जे निसर्गाने हिरावून घेतले आहे त्याबद्दल निसर्गावरचा अथवा नियतीचा रोष ..,,तर काही ठिकाणी सर्व काही असूनही काहीतरी वेगळे हवे असल्याची लालसा ..सर्व व्यवस्थित मिळूनही अंतर्मनातून असणारे असमाधान ..कारण काहीही असो सर्वांनी त्यावरचा शोधलेला उपाय मात्र अधिक जास्त नुकसानदायी होता हे खरे ..परवा एका अजित नावाच्या व्यक्तीशी बोललो ..उच्चशिक्षित असलेला अजित हा दक्षिण भारतीय..लग्न होऊन एक मुलगी झालेली ..छान राजाराणीचा संसार ..मित्रांसोबत कधीकाळी फक्त पार्टीत दारू पिणे ..एरवी सगळे छान .. अचानक पत्नी एका गंभीर आजारात मरण पावली ..हा आघात अजित सहन करू शकला नाही ..त्या नंतर रोज पिणे सुरु झाले ...निसर्गाने किवां देवाने माझ्यावर अन्याय केलाय ही भावना मनात रुजली ..त्यावर उपाय म्हणून बेशुद्ध होईपर्यंत दारू पिणे सुरु झाले ..लहानग्या मुली कडे दुर्लक्ष होऊ लागले ..आधार म्हणून आईवडील याच्या सोबत राहू लागले ..तरी काही फरक नाही ..शेवटी मुलीला आजोळी ठेवण्यात आले ..याने नोकरी सोडली ...घरची परस्थिती सुदैवाने चांगली असल्याने ..खाण्यापिण्याची आबाळ नव्हती ..मात्र याच्या सततच्या पिण्यामुळे म्हातारे आईवडील चिंतीत ..याला दुसरे लग्न करण्याचा सर्वांनी आग्रह केला मात्र हा तयार नाही ..मृत पत्नीच्या स्मृती विसरायला तयार नाही ..सारखे माझ्यावर अन्याय झालाय अशी तक्रार आणि दारू पिणे ..येथे आता सातव्या वेळी उपचारांना आला होता ...उपचारांच्या दरम्यान हा सतत दुर्मुखलेला असे ..त्याच्याशी बोलताना जाणवे की तो कुणावर तरी सूड म्हणून दारू पितोय ..अर्थात हा सूड स्वतःवरच उगवत होता खरेतर ..जन्म -मृत्यू कोणालाही चुकला नाही ..हे साधे सोपे सत्य स्वीकारायला तो तयार नाही ..शिवाय जी पत्नी गेलीय तिच्या दुखा:त दारू पिवून ..तो जे आईवडील ..मुलगी ..भावंडे वगैरे नातलग जिवंत होते त्यांप्रचंड ना दुखः देत होता हे त्याला समजत नव्हते ..जो पर्यंत त्याला हे समजणार नाही तोवर तो दारू पीत राहील ..अहंकारामुळे मानसोपचार तज्ञांची मदत घेण्यासही तयार नाही ..

दुसरा एक जण तीन मुली आहेत व मुलगा नाही ..घराण्याला वंशज नाही या व्यथेचे कारण करून व्यसनी झालेला ..मुलींच्या लग्नाची चिंता ..आर्थिक बाबी कशा व्यवस्थित पार पडतील ही चिंता ..आपण मेल्यावर आपल्या चितेला अग्नी देण्यास मुलगा नाही ही खंत ..याच्याही बाबतीत याच्या मते निसर्गाने याच्यावर अन्याय केलेला होता ..मुलगा होणे किवा मुलगी होणे हे आपल्या हाती नाही मात्र निसर्गाने जे दान पदरात टाकले आहे त्याचे व्यवस्थित पालन पोषण करावे चांगले संस्कार द्यावेत ..चांगले शिक्षण द्यावे ..पैश्यांची बचत करून योग्यवेळी लग्न करून द्यावे ही सरळ गोष्ट त्याला उमजत नव्हती ..शिवाय आपल्या मृत्युनंतर चितेला अग्नी कोणीही दिला तरी आपल्याला मोक्ष हा आपल्या कर्माने मिळणार आहे ..मुलाने अथवा मुलीने किवा कोणीही अग्नी दिला तरी काही फरक पडत नाही ..आपण मेल्यावर वंश संपला काय राहिला काय काही फरक नाही... हे याच्या गळी उतरणे कठीण होते ..एकाला जन्मतः अपंग मुलगा होता म्हणून म्हणे तो दारू पिऊन ते दुखः विसरण्याच्या प्रयत्नात असे ..एक जण मनासारखी नोकरी मिळाली नाही म्हणून नाराज ..कोणी परिस्थिती मुळे मनासारखे शिक्षण घेता आले नाही म्हणून दुखी:..एक जण लहानपणी आई लवकर वारली आईचे प्रेम अनुभवता आले नाही म्हणून व्यथित ..एकाला लग्न होऊन दहावर्षे झाली तरी मुल बाळ नाही ही व्यथा दारूत बुडवण्याच्या प्रयत्नात ..आवडत्या मुली सोबत लग्न झाले नाही म्हणून एकजण रागात दारू पीत असे ..त्याच्या मते कुटुंबीयांनी माझ्या भावना समजून घेतल्या नाहीत ..मात्र त्या नादात तो नंतर ज्या मुलीशी लग्न झाले तिला दारू पिवून किती दुख; देतोय हे समजून घ्यायला तयार नाही ..एकाला संपत्तीच्या वाटणीत योग्य वाट मिळाला नाही अशी तक्रार म्हणून तो दारू पीत होता ..एक जण असाही भेटला की ऑफिस मध्ये साहेब मलाच जास्त रागावतात म्हणून टेन्शन येते ते घालवायला दारू पितो ..

मी वरील गोष्टी माॅनीटर जवळ बोललो आणि त्याला विचारले यावर काय उपाय आहे ? ..माॅनिटर हसून म्हणाला ..स्विकार हा सगळ्यात सोपा उपाय आहे यावर ..मात्र मानव अनेकदा अहंकारामुळे आपल्याला निसर्गाने हे दिले आहे अथवा आपल्या बाबतीत जी दुखःद घटना घडली आहे ती स्वीकारू शकत नाही ..निसर्गाशी ..देवाशी ..परिस्थितीशी ..समाजाशी ...आणि काही वेळा स्वतःशी देखील भांडण करत रहातो माणूस ..मुख्य म्हणजे आयुष्यात कधीतरी दारूची अथवा मादक पदार्थांची चव घेतली असल्याने हे सगळे आपली व्यथा स्वीकार करण्याऐवजी ती व्यथा दारू पिवून विसरण्याचा प्रयत्न करतात ..दारू उतरली की भयाण वास्तव समोर येवून पुन्हा दारू पितात ..आपल्या पिण्यामुळे अनेकांना आपण दुखः देतोय हे गावीही नसते व्यसनीच्या ..आपल्या व्यथा विसरण्यासाठी दारू पिणाऱ्या व्यसानीला हे कळतच नाही की आपले दारू पिणे हेच इतरांच्या व्यथेचे कारण बनतेय ..अर्थात इथे सतत उपचारांमध्ये आम्ही हेच वारंवार सांगत असतो ..ज्यांना हे लवकर समजते ते व्यसनमुक्त राहण्यास सुरवात करतात ..ज्यांना अहंकारामुळे हे समजण्यास वेळ लागतो त्यांना वारंवार उपचार देणे भाग असते ..कारण तेवढ्या उपचारांच्या काळात का होईना त्यांची दारू बंद राहते व कुटुंबीय समाधानाचा श्वास घेवू शकतात ..माॅनीटर सांगत असलेली गोष्ट मलाही लागू होती ..मी स्वतचा अहंकार बाजूला ठेवून इथे जे जे शिकवतील ते सगळे आत्मसात करायचे असा निश्चय केला .

( बाकी पुढील भागात )